शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

डॉल्बी लावणाºयांची हयगय नाही : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 14:27 IST

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन ...

ठळक मुद्देराजारामपुरीतील प्रकाराचे दु:ख पोलीस कठोर भूमिका बजावणारमंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावाहरियाणातील घटनेने धक्का

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या क्षणी गाणी कोणती लावावीत, वाद्ये कोणती वाजवावीत हा मंडळांचा प्रश्न आहे. पण त्यामुळे समाजाला त्रास व  धोका होईल, असे करणे चुकीचे आहे.

गणेशोत्सवाला शंभर वर्षे पुर्ण झाल्याने नाना पाटेकर यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर काय बोलावे. आगामी दहा दिवस गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पाडावी. मिरवणूक व वाद्यांबाबत पोलीस शनिवारी सगळ्या मंडळांना परिपत्रक काढणार आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा कोणी प्रयत्न  केला तर प्रशासन हयगय करणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. डॉल्बी बाबतची कलमे पाहिली तर त्यामध्ये अनेक तरूणांची आयुष्य बरबाद होतील, पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. त्यामुळे मंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावा, असे आवाहन करत जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्याबाबतीत कठोर भूमिका घ्यावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. हरियाणातील घटनेने धक्काहरियाणा व पंजाब मध्ये राम रहीम सिंग यांच्या शिक्षेवरून घडलेला हिसांचाराची घटना निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्टÑातही त्यांचे काही अनुयायी असल्याने असा प्रकार होऊ नये, यासाठी सरकार सज्ज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.