शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

डच्चू नाही..राजीनामा दिला

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

शेतकरी संघातील राजकारण : मानसिंगराव जाधव यांचे म्हणणे; मनमानीस चाप लावल्याचा म्होरक्यांना राग

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचा कारभार काटकसरीने केला असून, संघाचे नुकसान होईल असे एकही कृत्य कार्यकारी संचालक म्हणून केलेले नाही; परंतु काही ‘म्होरक्यां’च्या मनमानीस चाप लावल्यानेच त्यांना मी या पदावर नको होतो, म्हणून विरोध सुरू झाल्यामुळे त्यांनी मला काढून टाकण्याऐवजी मी स्वत:हूनच राजीनामा दिला असल्याची माहिती संघाचे संचालक मानसिंगराव जाधव यांनी दिली.मंगळवार (दि. १७)च्या अंकात ‘लोकमत’मध्ये संघाच्या कार्यकारी संचालक पदावरून डच्चू देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबद्दलची वस्तुस्थिती स्वत: जाधव यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात येऊन दिली. ते म्हणाले, ‘मी गेली नऊ वर्षे संघाचा संचालक आहे. माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्यासमवेत काम करीत असताना सातत्याने संघाच्या हिताचाच विचार केला. त्यामुळेच आम्ही सात टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत लाभांश देऊ शकलो. कार्यकारी संचालक म्हणून गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या कामामुळे संस्थेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या काळातील सेवेचा मी एक पैसाही मोबदला घेतलेला नाही. संघाचे वाहन उपलब्ध होते; परंतु त्याचा वापर मी फक्त कार्यालयात येण्या-जाण्यासाठीच केला. इतरवेळी मी स्वत:चे वाहन वापरत असे. संघाच्या सभासदांना माझ्या कामाबद्दल विश्वास होता म्हणूनच मी गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालो. माझे हात स्वच्छ आहेत आणि कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकेल, असा एकही व्यवहार माझ्याकडून झालेला नाही.’संघाच्या मासिक बैठकीत जेव्हा माझ्याकडे राजीनामा मागण्यात आला तेव्हा तो मी तातडीने दिला आहे. कार्यकारी संचालक पदावरून दूर झालो तरी संघाचा संचालक म्हणून मी संस्थेत राहणार आहेच; त्यामुळे खरी लढाई आता सुरू झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले.कार्यकारी संचालक पदावर मी असल्याने काहींच्या हितसंंबंधांना बाधा येऊ लागली होती. कुंभी-कासारी कारखान्यावरील संघाच्या गोदामाच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. रीतसर इस्टिमेट मागवून ते करावे, असे सुचविले होते; परंतु दोन लाख १० हजार रुपयांचे हे काम एकच कोटेशन घेऊन आम्ही सांगतो त्या व्यक्तीस द्यावे, असा आग्रह काहींनी केला. तो मी मान्य केला नाही.संघाच्या पुनाळ शाखेत सुमारे एक लाख ७५ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. बिद्री शाखेत सुमारे सात लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. पुनाळ शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. बिद्री शाखेतील गैरव्यवहाराची रक्कम संबंधित व्यवस्थापकांकडून भरून घेऊन मगच चौकशी सुरू करावी, असे संचालक मंडळाच्या बैठकीतच ठरले होते. परंतु, या दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांच्या वेतनवाढी रोखून त्यांना कामावर घ्यावे, असा आग्रह होता. त्यास मी विरोध केला. ज्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे माझे म्हणणे होते.