शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतून चुली पेटत नाहीत

By admin | Updated: October 8, 2014 21:47 IST

प्रकाश आवाडे यांचे आवाहन : इचलकरंजीतील कामगार चाळीत पदयात्रा

इचलकरंजी : कॉँग्रेस पक्षाने मंजूर केलेल्या योजना आम्ही इचलकरंजीत आणल्या असून, त्या मी केल्या म्हणून वल्गना करणाऱ्या आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्यांना लोकप्रतिनिधीचे काम करता आले नाही. मात्र, त्यांनी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या विजेची चोरी केली. कष्टाला कोणतीही जात नसते अन् दंगलीतून कधीही चुली पेटत नसतात. या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर मिळेल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.येथील कामगार चाळ येथून प्रचार पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाटील वाडा, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी, शाहूनगर, बालाजी प्रोसेसर्स परिसर, जोशी दवाखाना परिसरात ही पदयात्रा निघाली. त्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेटमधील चौकात झालेल्या कॉर्नर सभेत आवाडे बोलत होते. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे ध्येय उराशी बाळगले असून, त्यादृष्टीने पावलेही टाकली आहेत. त्यानुसार जयभीमनगर व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांचे काम सुरू असून, लवकरच सर्वच झोपडपट्ट्यांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन करून प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घरकुल मिळणार आहे. या कामासंदर्भात गत पाच वर्षात विद्यमान आमदारांनी काहीचा पाठपुरावा केला नाही. उलट या चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले आहे. ज्या शहराने वस्त्रोद्योगात जागतिक पटलावर नाव कोरले, त्याच शहराची मान व प्रतिष्ठा आमदारांनी वीज चोरी करून खाली घालवली. रवी रजपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अरुण कांबळे यांनी केले. सुदीप वडिंगे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक तानाजी पोवार, विनोद आवळे, संतोष कांदेकर, गणेश जाधव, आदींची भाषणे झाली.नगरसेविका रेखा रजपुते, प्रमिला जावळे, रंगराव लाखे, प्रकाश आवळे, शशिकांत कांबळे, नारायण यरगुंटला, झाकीर जमादार, शेखर वराळे, अरुण निंबाळकर, प्रदीप कांबळे, बयाबाई गेजगे, नरेश नगरकर, राजू भडंगे, शांताराम लाखे, बाबासाहेब देसाई, चंद्रकांत कांबळे, अमित काकडे, प्रवीण कांबळे, विलास कुरणे, अशोक कांबळे, संतोष मुळे, उमेश कांबळे, प्रशांत आवळे, बबन कांबळे, नितीन चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)