शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:07 IST

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही ...

ठळक मुद्देअर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयवंतराव आवळे, दिनकरराव जाधव, बाळासाहेब सरनाईक, विशाल पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’ कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, बजरंग पाटील, राजेश पाटील, आदींची होती.

देशमुख म्हणाले, सध्या देश व राज्य ज्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. या अर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना आहे.ते म्हणाले, कॉँग्रेस पक्षात गटबाजी नसून ती सकारात्मक स्पर्धा आहे. येणाºया काळात सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशभर सरकारविरोधात समविचारी पक्ष एकत्र येत असून यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको.पोस्टरबाजीने विकास होत नाहीसध्या कोल्हापुरात राज्यातील मोठा मंत्री असूनही कुठलाही प्रश्न सुटल्याचे दिसत नसल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता देशमुख यांनी हाणला. नुसत्या विकासकामांच्या पोस्टरबाजीने विकास होत नाही, तर खºया अर्थाने सर्वसामान्य माणसाला त्याचा स्पर्श होणे गरजेचे आहे.खडसे, राणेंच्या प्रश्नाला बगलभाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या कॉँग्रेस प्रवेशाबाबत तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुन्हा कॉँग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नाला देशमुख यांनी बगल देत, हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने आपण बोलणे उचित नसल्याचे सांगितले.ऊसदरप्रश्नी सरकारने बैठक घ्यावी : राज्यात सध्या ऊसदर, एफआरपी, साखरेचे घसरलेले दर असे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून बैठक घेऊन मार्ग काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने बैठक घ्यावी, अन्यथा शेतकरी, कारखानदार अडचणीत येतील, असे देशमुख यांनी सांगितले.पक्षांतर केलेल्यांचा भ्रमनिरासकॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्वजण पुन्हा कॉँग्रेसमध्ये आल्याचे दिसतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.