शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:07 IST

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही ...

ठळक मुद्देअर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयवंतराव आवळे, दिनकरराव जाधव, बाळासाहेब सरनाईक, विशाल पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’ कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, बजरंग पाटील, राजेश पाटील, आदींची होती.

देशमुख म्हणाले, सध्या देश व राज्य ज्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. या अर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना आहे.ते म्हणाले, कॉँग्रेस पक्षात गटबाजी नसून ती सकारात्मक स्पर्धा आहे. येणाºया काळात सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशभर सरकारविरोधात समविचारी पक्ष एकत्र येत असून यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको.पोस्टरबाजीने विकास होत नाहीसध्या कोल्हापुरात राज्यातील मोठा मंत्री असूनही कुठलाही प्रश्न सुटल्याचे दिसत नसल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता देशमुख यांनी हाणला. नुसत्या विकासकामांच्या पोस्टरबाजीने विकास होत नाही, तर खºया अर्थाने सर्वसामान्य माणसाला त्याचा स्पर्श होणे गरजेचे आहे.खडसे, राणेंच्या प्रश्नाला बगलभाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या कॉँग्रेस प्रवेशाबाबत तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुन्हा कॉँग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नाला देशमुख यांनी बगल देत, हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने आपण बोलणे उचित नसल्याचे सांगितले.ऊसदरप्रश्नी सरकारने बैठक घ्यावी : राज्यात सध्या ऊसदर, एफआरपी, साखरेचे घसरलेले दर असे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून बैठक घेऊन मार्ग काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने बैठक घ्यावी, अन्यथा शेतकरी, कारखानदार अडचणीत येतील, असे देशमुख यांनी सांगितले.पक्षांतर केलेल्यांचा भ्रमनिरासकॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्वजण पुन्हा कॉँग्रेसमध्ये आल्याचे दिसतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.