शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य नको -अमित देशमुख : कॉँग्रेसमध्ये गटबाजी नव्हे, सकारात्मक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:07 IST

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही ...

ठळक मुद्देअर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना

कोल्हापूर : भाजप सरकारच्या धोरणाने कोणताही घटक समाधानी नाही; त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी सर्वांना दिसेल. सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली दिसत असून, यामध्ये खासदार राजू शेट्टीही कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे संकेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. कॉँग्रेसमध्ये गटबाजी नसून सकारात्मक स्पर्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयवंतराव आवळे, दिनकरराव जाधव, बाळासाहेब सरनाईक, विशाल पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’ कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील, बजरंग पाटील, राजेश पाटील, आदींची होती.

देशमुख म्हणाले, सध्या देश व राज्य ज्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. या अर्थसंकल्पातून देशभर नैराश्याची भावना आहे.ते म्हणाले, कॉँग्रेस पक्षात गटबाजी नसून ती सकारात्मक स्पर्धा आहे. येणाºया काळात सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देशभर सरकारविरोधात समविचारी पक्ष एकत्र येत असून यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी कॉँग्रेससोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको.पोस्टरबाजीने विकास होत नाहीसध्या कोल्हापुरात राज्यातील मोठा मंत्री असूनही कुठलाही प्रश्न सुटल्याचे दिसत नसल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता देशमुख यांनी हाणला. नुसत्या विकासकामांच्या पोस्टरबाजीने विकास होत नाही, तर खºया अर्थाने सर्वसामान्य माणसाला त्याचा स्पर्श होणे गरजेचे आहे.खडसे, राणेंच्या प्रश्नाला बगलभाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या कॉँग्रेस प्रवेशाबाबत तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुन्हा कॉँग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नाला देशमुख यांनी बगल देत, हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने आपण बोलणे उचित नसल्याचे सांगितले.ऊसदरप्रश्नी सरकारने बैठक घ्यावी : राज्यात सध्या ऊसदर, एफआरपी, साखरेचे घसरलेले दर असे प्रश्न बिकट होत चालले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून बैठक घेऊन मार्ग काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने बैठक घ्यावी, अन्यथा शेतकरी, कारखानदार अडचणीत येतील, असे देशमुख यांनी सांगितले.पक्षांतर केलेल्यांचा भ्रमनिरासकॉँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्वजण पुन्हा कॉँग्रेसमध्ये आल्याचे दिसतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.