शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:28 IST

यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देपीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहामध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वआढावा बैठक ीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी महाविद्यालयाचे डॉ. मोहिते, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून यामध्ये सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा महत्त्वाच्या पिकांचा अंतर्भाव आहे. पीक उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या काटेकोर नियोजनासोबतच पावसास होणारा विलंब अथवा प्रमाणाबाहेरचा अधिक पाऊस या गोष्टींचा विचार करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे नियोजन व आराखडा तयार ठेवावा.

हुमणी/अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी ठिकठिकाणी सर्कलनिहाय शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे नियोजन करावे व तसा नियोजन आराखडा सादर करावा. हुमणीवरील उपाययोजनेबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये माहितीफ्लेक्स लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आपली शेती ही डोंगराळ भागामध्ये जास्त असल्याने मिनी शुगरकेन हार्वेस्टिंगचा विचार व्हावा व कृषिपूरक उद्योग-व्यवसायाचाही विचार व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.अमन मित्तल म्हणाले, शेतीसाठी पाणी व रासायनिक खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यास हानी पोहोचत असल्याचे दिसून येत असल्याने सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.

गटशेतीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पीक उत्पादकतेचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर