शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:28 IST

यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देपीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहामध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वआढावा बैठक ीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी महाविद्यालयाचे डॉ. मोहिते, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून यामध्ये सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा महत्त्वाच्या पिकांचा अंतर्भाव आहे. पीक उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या काटेकोर नियोजनासोबतच पावसास होणारा विलंब अथवा प्रमाणाबाहेरचा अधिक पाऊस या गोष्टींचा विचार करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे नियोजन व आराखडा तयार ठेवावा.

हुमणी/अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी ठिकठिकाणी सर्कलनिहाय शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे नियोजन करावे व तसा नियोजन आराखडा सादर करावा. हुमणीवरील उपाययोजनेबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये माहितीफ्लेक्स लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आपली शेती ही डोंगराळ भागामध्ये जास्त असल्याने मिनी शुगरकेन हार्वेस्टिंगचा विचार व्हावा व कृषिपूरक उद्योग-व्यवसायाचाही विचार व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.अमन मित्तल म्हणाले, शेतीसाठी पाणी व रासायनिक खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यास हानी पोहोचत असल्याचे दिसून येत असल्याने सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.

गटशेतीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पीक उत्पादकतेचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर