शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला आता पैशांचा तुटवडा नसणार

By admin | Updated: October 19, 2016 00:41 IST

ट्रेझरी झाल्या अधिक सतर्क : अब्जावधी रुपयांचा निधी ठेवला राखीव

रमेश पाटील -कसबा बावडा -व्यापारी वर्गाला कोणत्याही परिस्थितीत या सणाच्या काळात पैशांचा तुटवडा भासू नये, म्हणून कोल्हापुरातील बँकांच्या ‘ट्रेझरी’ आता अधिकच सतर्क झाल्या आहेत. बहुतेक ट्रेझरींमध्ये अब्जावधी रुपयांचा निधी शिल्लक ठेवला आहे. बँक शाखांकडून जेवढ्या रकमेची मागणी होईल, तेवढी मागणी पूर्ण केली जात आहे. यंदाच्या दिवाळी सणासाठी दहा अब्जांहून अधिक रकमेची गरज भासणार असल्याचे एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे दिवसेंदिवस या काळात बँकांच्या तिजोऱ्या काहीशा हलक्या होण्यास सुरुवात होते. बँकांच्या तिजोऱ्या जरी हलक्या होत गेल्या तरी, त्यांना ट्रेझरीमार्फत पैशांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे बँकांत कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नसतो. मात्र, दिवाळीच्या अगोदर काही दिवस म्हणजे शेवटच्या तीन-चार दिवसांत बँकांना पैशांची टंचाई काही प्रमाणात जाणवू लागते. कारण पैसे असूनही रिझर्व्ह बँकेकडून ‘मागणी तसा पुरवठा’ वेळेत होऊ शकत नसल्यामुळे, यंदा मात्र अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण दसरा सणावेळी रिझर्व्ह बँकेकडून बऱ्यापैकी निधी येथील ट्रेझरीकडे आला आहे. तसेच बँकांनीही मोठ्या प्रमाणात या सणाची तरतूद म्हणून निधी राखीव ठेवला आहे. सामान्य ग्राहक किंवा पगारदार नोकर मंडळी ही बँकांच्या एटीएममधून पैसे काढतात. तर मोठमोठ्या संस्था, कंपन्या बोनससाठी रोख रकमेची मागणी करतात. साखर कारखाने सुद्धा दिवाळीच्या तोंडावर हप्ता देतात. त्यामुळे या काळात बँकांतून खूप मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जाते. त्याचा सारा परिणाम बँकांच्या तिजोरीप्रमाणे ट्रेझरी शाखांवरही होत असतो.दररोज एटीएममधून व बँकांतून पैसे किती काढले, याची आकडेवारी रिझर्व्ह बॅकेला समजते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून पैशांचा पुरवठा बँकांना होतो. दिवाळीच्या काळात बँका मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करतात. त्या पटीत रिझर्व्ह बँकेकडून शाखांना पैसे येत नाहीत.एटीएममधून दररोज पाच कोटीसध्या दिवाळीमुळे जिल्ह्यातील चारशेंहून अधिक एटीएम सेंटरमधून दररोज सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम काढली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यामध्ये वाढ होण्याची आणखी शक्यता आहे, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक (आय.टी.) विनपकुमार मिश्रा यांनी दिली.