शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दिवाळीला आता पैशांचा तुटवडा नसणार

By admin | Updated: October 19, 2016 00:41 IST

ट्रेझरी झाल्या अधिक सतर्क : अब्जावधी रुपयांचा निधी ठेवला राखीव

रमेश पाटील -कसबा बावडा -व्यापारी वर्गाला कोणत्याही परिस्थितीत या सणाच्या काळात पैशांचा तुटवडा भासू नये, म्हणून कोल्हापुरातील बँकांच्या ‘ट्रेझरी’ आता अधिकच सतर्क झाल्या आहेत. बहुतेक ट्रेझरींमध्ये अब्जावधी रुपयांचा निधी शिल्लक ठेवला आहे. बँक शाखांकडून जेवढ्या रकमेची मागणी होईल, तेवढी मागणी पूर्ण केली जात आहे. यंदाच्या दिवाळी सणासाठी दहा अब्जांहून अधिक रकमेची गरज भासणार असल्याचे एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे दिवसेंदिवस या काळात बँकांच्या तिजोऱ्या काहीशा हलक्या होण्यास सुरुवात होते. बँकांच्या तिजोऱ्या जरी हलक्या होत गेल्या तरी, त्यांना ट्रेझरीमार्फत पैशांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे बँकांत कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नसतो. मात्र, दिवाळीच्या अगोदर काही दिवस म्हणजे शेवटच्या तीन-चार दिवसांत बँकांना पैशांची टंचाई काही प्रमाणात जाणवू लागते. कारण पैसे असूनही रिझर्व्ह बँकेकडून ‘मागणी तसा पुरवठा’ वेळेत होऊ शकत नसल्यामुळे, यंदा मात्र अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण दसरा सणावेळी रिझर्व्ह बँकेकडून बऱ्यापैकी निधी येथील ट्रेझरीकडे आला आहे. तसेच बँकांनीही मोठ्या प्रमाणात या सणाची तरतूद म्हणून निधी राखीव ठेवला आहे. सामान्य ग्राहक किंवा पगारदार नोकर मंडळी ही बँकांच्या एटीएममधून पैसे काढतात. तर मोठमोठ्या संस्था, कंपन्या बोनससाठी रोख रकमेची मागणी करतात. साखर कारखाने सुद्धा दिवाळीच्या तोंडावर हप्ता देतात. त्यामुळे या काळात बँकांतून खूप मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जाते. त्याचा सारा परिणाम बँकांच्या तिजोरीप्रमाणे ट्रेझरी शाखांवरही होत असतो.दररोज एटीएममधून व बँकांतून पैसे किती काढले, याची आकडेवारी रिझर्व्ह बॅकेला समजते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून पैशांचा पुरवठा बँकांना होतो. दिवाळीच्या काळात बँका मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करतात. त्या पटीत रिझर्व्ह बँकेकडून शाखांना पैसे येत नाहीत.एटीएममधून दररोज पाच कोटीसध्या दिवाळीमुळे जिल्ह्यातील चारशेंहून अधिक एटीएम सेंटरमधून दररोज सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम काढली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यामध्ये वाढ होण्याची आणखी शक्यता आहे, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक (आय.टी.) विनपकुमार मिश्रा यांनी दिली.