शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रस्त्यांवर पुन्हा खुदाई का?

By admin | Updated: May 27, 2016 00:05 IST

स्थायी सभेत जाब : ’स्पॉट बिलिंग’च्या प्रक्रियेतील दोष दूर करणार

कोल्हापूर : ‘आयआरबी’च्या रस्त्यांसह शहरातील नवीन रस्त्यांवर खासगी कंपनीस खुदाई करण्यास का आणि कोणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली? असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समिती सभेत विचारण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. दरम्यान खुदाई केलेला रस्ता दुरुस्त केल्याशिवाय कामास परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक खासगी कंपनीकडून जमिनीखालून केबल टाकण्याचे काम करत आहे. ‘आयआरबी’चे तसेच नगरोत्थानमधून केलेले रस्ते खुदाईस पुढे पाच वर्षे मनाई केली असतानाही आता कोणाच्या सांगण्यावर परवानगी देण्यात आली? किती किलोमीटर रस्त्यांची खुदाई केली याची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, त्याचे काय झाले? अशी विचारणा जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, सूरमंजिरी लाटकर, सुनील पाटील, अजित ठाणेकर, आदींनी केली. खुदाई केलेले रस्ते दुरुस्त केल्याशिवाय, त्यांना पुढे खुदाई करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी प्रशासनाने सांगितले की, ४०.६१ किलोमीटर लांबीची केबल टाकण्यास परवानगी दिली असून, मोबदल्यात दहा कोटी ८४ लाख रुपये संबंधित कंपनीकडून भरून घेतले आहेत. चारही विभागीय कार्यालयांमार्फत केलेल्या कामाची मोजणी करण्यात आली असून, ती परवानगीपेक्षा कमी आहे. खुदाई केलेला रस्ता दुरुस्त केल्याशिवाय पुढील परवानगी दिली जाणार नाही. तावडे हॉटेल परिसरात बांधकामे करण्याबाबत न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश असताना पुन्हा बांधकामे सुरू असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बांधकामे सुरू असताना का नोटीस देण्यात आली नाही, अशी विचारणा जयश्री चव्हाण यांनी केली. नव्याने होत असलेल्या बांधकामे न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात यावीत, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली. न्यायालयात १३ जूनला सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, तसेच जी बांधकामे सुरू आहेत, त्या मालकांना नोटिसा देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाकडील स्पॉट बिलिंगवर सभेत चर्चा झाली. छोट्या स्लीपवर बिले दिली जात असून दोन-तीन दिवसांनंतर त्यावरील शाई पुसली जाते. काही नागरिकांना तीन ते सहा महिन्यांची एकदम बिले दिली जात आहेत. नागरिकांना वेळेत बिले मिळत नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी सर्वच सदस्यांनी केल्या. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना फोनवरील अ‍ॅप, तसेच फोटो डाऊनलोडला विलंब लागतो, जलदगतीचे ब्रॉडबॅँड घेण्याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. एक कर्मचाऱ्यांकडून दिवसाला किमान १०० बिले होतील अशी स्पीड मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात नक्की सुधारणा केल्या जातील. (प्रतिनिधी)