शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नवीन रस्त्यांवर पुन्हा खुदाई का?

By admin | Updated: May 27, 2016 00:05 IST

स्थायी सभेत जाब : ’स्पॉट बिलिंग’च्या प्रक्रियेतील दोष दूर करणार

कोल्हापूर : ‘आयआरबी’च्या रस्त्यांसह शहरातील नवीन रस्त्यांवर खासगी कंपनीस खुदाई करण्यास का आणि कोणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली? असा संतप्त सवाल गुरुवारी स्थायी समिती सभेत विचारण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. दरम्यान खुदाई केलेला रस्ता दुरुस्त केल्याशिवाय कामास परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक खासगी कंपनीकडून जमिनीखालून केबल टाकण्याचे काम करत आहे. ‘आयआरबी’चे तसेच नगरोत्थानमधून केलेले रस्ते खुदाईस पुढे पाच वर्षे मनाई केली असतानाही आता कोणाच्या सांगण्यावर परवानगी देण्यात आली? किती किलोमीटर रस्त्यांची खुदाई केली याची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, त्याचे काय झाले? अशी विचारणा जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, सूरमंजिरी लाटकर, सुनील पाटील, अजित ठाणेकर, आदींनी केली. खुदाई केलेले रस्ते दुरुस्त केल्याशिवाय, त्यांना पुढे खुदाई करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी प्रशासनाने सांगितले की, ४०.६१ किलोमीटर लांबीची केबल टाकण्यास परवानगी दिली असून, मोबदल्यात दहा कोटी ८४ लाख रुपये संबंधित कंपनीकडून भरून घेतले आहेत. चारही विभागीय कार्यालयांमार्फत केलेल्या कामाची मोजणी करण्यात आली असून, ती परवानगीपेक्षा कमी आहे. खुदाई केलेला रस्ता दुरुस्त केल्याशिवाय पुढील परवानगी दिली जाणार नाही. तावडे हॉटेल परिसरात बांधकामे करण्याबाबत न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश असताना पुन्हा बांधकामे सुरू असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बांधकामे सुरू असताना का नोटीस देण्यात आली नाही, अशी विचारणा जयश्री चव्हाण यांनी केली. नव्याने होत असलेल्या बांधकामे न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात यावीत, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली. न्यायालयात १३ जूनला सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, तसेच जी बांधकामे सुरू आहेत, त्या मालकांना नोटिसा देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाकडील स्पॉट बिलिंगवर सभेत चर्चा झाली. छोट्या स्लीपवर बिले दिली जात असून दोन-तीन दिवसांनंतर त्यावरील शाई पुसली जाते. काही नागरिकांना तीन ते सहा महिन्यांची एकदम बिले दिली जात आहेत. नागरिकांना वेळेत बिले मिळत नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी सर्वच सदस्यांनी केल्या. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना फोनवरील अ‍ॅप, तसेच फोटो डाऊनलोडला विलंब लागतो, जलदगतीचे ब्रॉडबॅँड घेण्याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. एक कर्मचाऱ्यांकडून दिवसाला किमान १०० बिले होतील अशी स्पीड मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात नक्की सुधारणा केल्या जातील. (प्रतिनिधी)