शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:47 IST

महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देगढूळ पाण्यामुळे नागरिक हैराणतुळजाभवानी प्रभागातील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.तुळजाभवानी मंदिर प्रभागातील ११ कॉलनींमध्ये तसेच साने गुरुजी वसाहतीमधील काही कॉलनींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद पडला होता. त्यानंतर तो सुरू झाला; पण अनेकांच्या नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागले.

नळाला येणारे पाणी प्रक्रिया न करता थेट नदीतून उचलून सोडले जाते की काय, इतके लालभडक पाणी नळाला येते. कधीकधी काळपट पाणी येते. एखादी कळशी पाण्याने भरून ठेवली की संध्याकाळपर्यंत तिच्या तळाला तांबड्या मातीचा थर साचलेला असतो.

या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत. खासगी दवाखान्यात उपचाराला येणाऱ्या दहापैकी आठ रुग्ण पोटविकाराचे आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरही खराब होत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या गढूळ पाणी पुरवठ्याबाबत नागरिक प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडे तक्रार करीत आहेत. दिंडोर्ले हे संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे तक्रार करतात. अधिकारी ऐकून घेतात; पण काम काहीच करीत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक दिंडोर्ले यांनीही अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गुरुवारी तर नगरसेवक दिंडोर्ले यांनी प्रभागातील नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. पाणी गढूळ येणे, कमी दाबाने येणे, वेळेवर न येणे अशा प्रकारच्या तक्रारी होत असून मी वारंवार जल अभियंता, उपजल अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे; परंतु त्यांच्याकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचे आहे. पण त्या आधी नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन दिंडोर्ले यांनी केले आहे. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर