शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:47 IST

महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देगढूळ पाण्यामुळे नागरिक हैराणतुळजाभवानी प्रभागातील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.तुळजाभवानी मंदिर प्रभागातील ११ कॉलनींमध्ये तसेच साने गुरुजी वसाहतीमधील काही कॉलनींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद पडला होता. त्यानंतर तो सुरू झाला; पण अनेकांच्या नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागले.

नळाला येणारे पाणी प्रक्रिया न करता थेट नदीतून उचलून सोडले जाते की काय, इतके लालभडक पाणी नळाला येते. कधीकधी काळपट पाणी येते. एखादी कळशी पाण्याने भरून ठेवली की संध्याकाळपर्यंत तिच्या तळाला तांबड्या मातीचा थर साचलेला असतो.

या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत. खासगी दवाखान्यात उपचाराला येणाऱ्या दहापैकी आठ रुग्ण पोटविकाराचे आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरही खराब होत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या गढूळ पाणी पुरवठ्याबाबत नागरिक प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडे तक्रार करीत आहेत. दिंडोर्ले हे संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे तक्रार करतात. अधिकारी ऐकून घेतात; पण काम काहीच करीत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक दिंडोर्ले यांनीही अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गुरुवारी तर नगरसेवक दिंडोर्ले यांनी प्रभागातील नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. पाणी गढूळ येणे, कमी दाबाने येणे, वेळेवर न येणे अशा प्रकारच्या तक्रारी होत असून मी वारंवार जल अभियंता, उपजल अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे; परंतु त्यांच्याकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचे आहे. पण त्या आधी नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन दिंडोर्ले यांनी केले आहे. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर