शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसमध्ये टोळी करून डावलले

By admin | Updated: April 2, 2017 00:39 IST

प्रकाश आवाडे : निर्णय घेतला नसता तर गट नेस्तनाबूत झाला असता

इचलकरंजी : आवाडे गटाने घेतलेला निर्णय योग्य असून, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. हा निर्णय आता घेतला नसता तर आमचा गट नेस्तनाबूत झाला असता. जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या दळभद्री नेत्यांनी टोळी करून आवाडेंना डावलले. त्याचा हिशेब चुकता करून आज जिल्हा परिषदेत आम्ही महत्त्वाच्या भूमिकेत आहोत, असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या एकसष्टी समारंभानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, आमच्या दोन सदस्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य एकत्रित असून, जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीतही आमची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालण्याचे दिवस गेले असून, आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही नव्याने वाट तयार केली असून, त्या वाटेवरून वाटचाल करीत लवकरच त्याचा हाय-वे केला जाणार आहे.कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी कॉँग्रेसची पार्श्वभूमी व इतिहास विसरला असल्याची टीका केली. तसेच जिल्हा कॉँग्रेसमध्ये इचलकरंजी कॉँग्रेसचे योगदान पूर्वीपासूनच मोलाचे राहिले आहे. याचा विसर पडल्याने तसेच व्यक्तीद्वेषातून डावलल्याची खंत व्यक्त केली. यावेळी राहुल आवाडे, प्रकाश मोरे, अशोक आरगे, शशांक बावचकर, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)