शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटीलच

By admin | Updated: March 25, 2016 23:44 IST

काँग्रेसमध्ये चढाओढ : काही दिवस संधी मिळण्याची शक्यता

आयुब मुल्ला --खोची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्या तरी त्यास लवकर मूर्त स्वरूप येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कालावधी संपण्या इतपत त्यास वेळ लागेल. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पी. एन. पाटील हेच या पदावर आणखी काही महिने राहतील; परंतु या पाठीमागे माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे या गटाचा खरा संघर्ष कारणीभूत आहे.सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदाला वाढीव मुदत मिळवून विराजमान झालेले राज्यातील पी. एन. पाटील हे एकमेव जिल्हाध्यक्ष आहेत. मध्यंतरी प्रकाश आवाडे यांनी जोरदार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. तत्कालीन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी ए. के. अँटोनी यांची तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख व जयवंतराव आवळे यांनी दिल्लीत भेट घेऊन पाटील यांच्या होणाऱ्या बदलीस स्थगिती मिळविली होती. त्यानंतरही प्रयत्न झाले; परंतु पाटीलच अध्यक्षपदी कायम राहिले.विधान परिषद निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मागितली. अखेर अध्यक्षपदाचा शब्द मिळाल्याने त्यांनी माघार घेतली, असे बोलले जाते; परंतु तरीसुद्धा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांचा त्यांच्या निवडीला थेट विरोध आहे. यामध्ये प्रामुख्याने जयवंतराव आवळे, पी. एन. पाटील यांचा समावेश आहे. हे दोघे जवळचे मित्र आहेत, तर या दोघांचा प्रखर राजकीय तोही पक्षाअंतर्गत विरोधक हे प्रकाश आवाडे आहेत. हीच अडचण आवाडे यांना प्रत्येक वेळी अध्यक्षपदाला अडचणीची ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष बदलाबाबत प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी आवाडे यांनी हक्काने मीच अध्यक्षपदाचा दावेदार असल्याची भूमिका मांडली; परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या काही जणांनी किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत तरी अध्यक्षपद बदलू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा पी. एन. पाटील हेच राहतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावाहातकणंगले तालुक्यातील जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांचे राजकीय वैर अजून घट्ट आहे, असे दिसते; परंतु ते मिटावे, एकत्र यावेत व काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावा, त्यामुळे पक्ष भक्कम होईल. अन्यथा वैर कायमच राहिले तर याचा फायदा विरोधी पक्षांना आपोआपच होत राहील. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे पर्यायाने काँग्रेसचेच नुकसान होईल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.