शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटीलच

By admin | Updated: March 25, 2016 23:44 IST

काँग्रेसमध्ये चढाओढ : काही दिवस संधी मिळण्याची शक्यता

आयुब मुल्ला --खोची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्या तरी त्यास लवकर मूर्त स्वरूप येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कालावधी संपण्या इतपत त्यास वेळ लागेल. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पी. एन. पाटील हेच या पदावर आणखी काही महिने राहतील; परंतु या पाठीमागे माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे या गटाचा खरा संघर्ष कारणीभूत आहे.सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदाला वाढीव मुदत मिळवून विराजमान झालेले राज्यातील पी. एन. पाटील हे एकमेव जिल्हाध्यक्ष आहेत. मध्यंतरी प्रकाश आवाडे यांनी जोरदार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. तत्कालीन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी ए. के. अँटोनी यांची तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख व जयवंतराव आवळे यांनी दिल्लीत भेट घेऊन पाटील यांच्या होणाऱ्या बदलीस स्थगिती मिळविली होती. त्यानंतरही प्रयत्न झाले; परंतु पाटीलच अध्यक्षपदी कायम राहिले.विधान परिषद निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मागितली. अखेर अध्यक्षपदाचा शब्द मिळाल्याने त्यांनी माघार घेतली, असे बोलले जाते; परंतु तरीसुद्धा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांचा त्यांच्या निवडीला थेट विरोध आहे. यामध्ये प्रामुख्याने जयवंतराव आवळे, पी. एन. पाटील यांचा समावेश आहे. हे दोघे जवळचे मित्र आहेत, तर या दोघांचा प्रखर राजकीय तोही पक्षाअंतर्गत विरोधक हे प्रकाश आवाडे आहेत. हीच अडचण आवाडे यांना प्रत्येक वेळी अध्यक्षपदाला अडचणीची ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष बदलाबाबत प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी आवाडे यांनी हक्काने मीच अध्यक्षपदाचा दावेदार असल्याची भूमिका मांडली; परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या काही जणांनी किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत तरी अध्यक्षपद बदलू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा पी. एन. पाटील हेच राहतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावाहातकणंगले तालुक्यातील जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांचे राजकीय वैर अजून घट्ट आहे, असे दिसते; परंतु ते मिटावे, एकत्र यावेत व काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावा, त्यामुळे पक्ष भक्कम होईल. अन्यथा वैर कायमच राहिले तर याचा फायदा विरोधी पक्षांना आपोआपच होत राहील. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे पर्यायाने काँग्रेसचेच नुकसान होईल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.