शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

..म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच; व्ही.बी.पाटील यांचे प्रत्युतर 

By विश्वास पाटील | Updated: September 9, 2024 19:30 IST

गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य 

कोल्हापूर : कागलच्या गैबी चौकातील सभेत मी केलेले भाषण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलेच झोंबलेले दिसते. भैया माने यांच्याकडून त्यांनी माझ्यावर केलेली टीका म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच असल्याचे प्रत्युतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिले.कागल आणि जिल्हा बँकेचा मला कायमच द्वेष असल्याची टीका मुश्रीफ यांच्या आडून भैय्या माने यांनी करणे म्हणजे सौ चुहे खा के..या प्रकारातील आहे. मुश्रीफ यांना राजकारणात ज्यांनी मोठं केलं त्या शामराव भिवाजी पाटील, विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि आता शरद पवार यांना मुश्रीफ यांनी निव्वळ सत्तेच्या लाभासाठी टांग मारली. मंडलिक यांचे राजकारण संपवायला निघालेल्या या राक्षसी माणसाला कागलच्या जनतेने मंडलिक कारखाना, लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आहे.तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची मंडलिक यांच्याशी भेट होऊ नये हे कारस्थान केले होते. ज्यांनी गोकुळच्या निवडणुकीत अंबरीश घाटगे यांना उमेदवारी मिळू नये आणि वीरेंद्र मंडलिक व आमदार राजेश पाटील यांची पत्नी अर्थात मंडलिक साहेबांची कन्या हे दोघे निवडून येऊ नयेत यासाठी सगळी ताकद पणाला लावलीत असे षडयंत्र करणाऱ्याच्या तोंडी कागलच्या हिताची भाषा शोभत नाही. 'या निवडणुकीत तुमचा हिशोब चुकता करणार' ज्यांना तुम्ही माझ्यावर टीका करायला लावली ते भैया माने हे विधानसभा निवडणुकीपर्यंत तुमच्याकडे राहतील काय? हीच शंका आहे. कारण या निवडणुकीत अनेकजण तुमचा हिशोब चुकता करणार आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हा भस्मासूर कागलची जनता यावेळेला नक्कीच गाडणार आहे. राहिला विषय जिल्हा बँकेचा, तिथे आपण काय उद्योग केले आहेत आणि कुणाचे खिसे भरले आहेत याचा पाढा पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. कारण जिल्हा बँक ही या जिल्ह्यातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांची आधार आहे. ती काय कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. आज तिचा वापर आपण स्वतःची मालमत्ता असल्यासारखी करत आहात, त्याविरुद्ध मी बोलणार आणि अजून बोलणार आहे असा इशारा व्ही.बी. यांनी दिला.गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य कोल्हापूर उत्तर विधानसभा बाबतीत नेत्यांनी आदेश दिल्यास व आघाडीने जबाबदारी टाकल्यास लढण्यास तयार आहे.  मी गेले 20 वर्षे सामाजिक कामातून हजारो लोकांची ऋणानुबंध जपले आहेत. त्याची पोचपावती कोल्हापूरची जनता मला निश्चितच देईन.  परंतु ते मला फार महत्त्वाचं नसून भ्रष्टाचार आणि गद्दारी गाडण्यासाठी हे महत्त्वाचं आहे म्हणून कागलची तळागाळातील जनता त्यांचा हिशोब चुकता करणार याचा मला आत्मविश्वास आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ