शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

जिल्ह्यातील १५ कोटी जाणार रिझर्व्ह बँकेत

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

बँका धास्तावल्या : दहा वर्षे व्यवहार नसणाऱ्या खातेदारांना फटका

कोल्हापूर : ज्या खात्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही अशा व मालकी हक्क न सांगितलेल्या खात्यातील रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश आल्याने बँका चांगल्याच धास्तावल्या आहेत.जिल्ह्यातून १५ कोटी रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करावी लागणार आहे. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित खातेदारांनी पैसे परत मागितले तर त्याला बँकेच्या स्वभांडवलातून द्यावे लागणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण आणले. दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रकमा ‘ठेवीदार जागरूकता शिक्षण निधी’साठी वर्ग करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात ठेवीदार हा महत्त्वाचा घटक आहे. ठेवी हा कच्चा माल असून त्यावरच कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात ठेवीदाराला संरक्षण मिळावे, यासाठी ठेवीदार जागरूकता शिक्षणाचा कार्यक्रम रिझर्व्ह बँकेने हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून दहा वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यावरील रकमा या निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अशा रकमा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक संस्थांमधून ठेवी तशाच पडून आहेत, बचत खात्यावरील चारशे-पाचशे रुपयांच्या रकमा तर मोठ्या प्रमाणात आहेत. या रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग कराव्या लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ठेवीदार अथवा खातेदारांने पैशांची मागणी केली तर बँकेने स्वनिधीतून हे पैसे द्यायचे. एकतर या रकमा बँकांकडे पडून असल्याने त्याचा फायदा बँकांना व्हायचा, तो कमी झालाच पण त्याबरोबर मागणी करणाऱ्या ठेवीदारांना पैसे द्यावे लागणार असल्याने बँका धास्तावल्या आहेत. (प्रतिनिधी)