शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जिल्ह्यातील १५ कोटी जाणार रिझर्व्ह बँकेत

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

बँका धास्तावल्या : दहा वर्षे व्यवहार नसणाऱ्या खातेदारांना फटका

कोल्हापूर : ज्या खात्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही अशा व मालकी हक्क न सांगितलेल्या खात्यातील रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश आल्याने बँका चांगल्याच धास्तावल्या आहेत.जिल्ह्यातून १५ कोटी रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करावी लागणार आहे. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित खातेदारांनी पैसे परत मागितले तर त्याला बँकेच्या स्वभांडवलातून द्यावे लागणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण आणले. दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रकमा ‘ठेवीदार जागरूकता शिक्षण निधी’साठी वर्ग करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात ठेवीदार हा महत्त्वाचा घटक आहे. ठेवी हा कच्चा माल असून त्यावरच कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात ठेवीदाराला संरक्षण मिळावे, यासाठी ठेवीदार जागरूकता शिक्षणाचा कार्यक्रम रिझर्व्ह बँकेने हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून दहा वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यावरील रकमा या निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अशा रकमा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक संस्थांमधून ठेवी तशाच पडून आहेत, बचत खात्यावरील चारशे-पाचशे रुपयांच्या रकमा तर मोठ्या प्रमाणात आहेत. या रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग कराव्या लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ठेवीदार अथवा खातेदारांने पैशांची मागणी केली तर बँकेने स्वनिधीतून हे पैसे द्यायचे. एकतर या रकमा बँकांकडे पडून असल्याने त्याचा फायदा बँकांना व्हायचा, तो कमी झालाच पण त्याबरोबर मागणी करणाऱ्या ठेवीदारांना पैसे द्यावे लागणार असल्याने बँका धास्तावल्या आहेत. (प्रतिनिधी)