शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

जिल्ह्यातील १५ कोटी जाणार रिझर्व्ह बँकेत

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

बँका धास्तावल्या : दहा वर्षे व्यवहार नसणाऱ्या खातेदारांना फटका

कोल्हापूर : ज्या खात्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही अशा व मालकी हक्क न सांगितलेल्या खात्यातील रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश आल्याने बँका चांगल्याच धास्तावल्या आहेत.जिल्ह्यातून १५ कोटी रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करावी लागणार आहे. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित खातेदारांनी पैसे परत मागितले तर त्याला बँकेच्या स्वभांडवलातून द्यावे लागणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण आणले. दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रकमा ‘ठेवीदार जागरूकता शिक्षण निधी’साठी वर्ग करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात ठेवीदार हा महत्त्वाचा घटक आहे. ठेवी हा कच्चा माल असून त्यावरच कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात ठेवीदाराला संरक्षण मिळावे, यासाठी ठेवीदार जागरूकता शिक्षणाचा कार्यक्रम रिझर्व्ह बँकेने हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून दहा वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यावरील रकमा या निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अशा रकमा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक संस्थांमधून ठेवी तशाच पडून आहेत, बचत खात्यावरील चारशे-पाचशे रुपयांच्या रकमा तर मोठ्या प्रमाणात आहेत. या रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग कराव्या लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ठेवीदार अथवा खातेदारांने पैशांची मागणी केली तर बँकेने स्वनिधीतून हे पैसे द्यायचे. एकतर या रकमा बँकांकडे पडून असल्याने त्याचा फायदा बँकांना व्हायचा, तो कमी झालाच पण त्याबरोबर मागणी करणाऱ्या ठेवीदारांना पैसे द्यावे लागणार असल्याने बँका धास्तावल्या आहेत. (प्रतिनिधी)