शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:02 IST

राजाराम लोंढे । कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी यंदा उत्पादकांना तब्बल १२८ कोटी दूध फरकाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांची ...

ठळक मुद्देत्यामुळे दिवाळीबरोबरच या दोन्ही सणांत शेतकºयांना हातभार मिळत आहे.गावागावांत राजकारणासाठी दूध संस्थांचे पेव फुटले असले तरी त्याचा फायदा उत्पादकांना झालेला दिसतो.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी यंदा उत्पादकांना तब्बल १२८ कोटी दूध फरकाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी खºया अर्थाने तेजोमय बनली आहे. बहुतांश संस्थांनी स्वत:च्या नफ्यातून या रकमेचे वाटप केले असून, दूध संघांकडून मिळणाºया फरकाचे ‘संक्रांत’ व ‘गुढीपाडव्या’ला, तर इतर ठेवींचे गणेशोत्सव, दसºयात वाटप केले जाते.

दिवाळीच्या लख्ख प्रकाशाने शेतकºयांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन सुखाचा प्रकाश पडला का, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी अलीकडील पाच-दहा वर्षांत दूध व्यवसायामुळे शेतकºयांची दिवाळीच खºया अर्थाने ‘तेजोमय’ होऊ लागली आहे. पूर्वी उसावर कुटुंबाचा चरितार्थ चालविताना शेतकºयांची दमछाक उडत होती. उसाचे कांडे जमिनीत लावल्यापासून सोळा महिन्यांनी तुटते, त्याचे पैसे सतराव्या महिन्यात मिळतात.

विकास संस्थेचे कर्ज भरल्यानंतर उर्वरित पैसे हातात येतात. मग त्या पैशांवर वर्षभर संसाराचा गाडा चालवायचा. अलीकडील दहा-पंधरा वर्षांपासून शेती व शेतकºयांना दूध व्यवसायाने तारले आहे. दर दहा दिवसांनी मिळणाºया दूध बिलांमुळे शेतकºयांची बाजारातील पत वाढली. शेतकºयांच्या घरात सण होऊ लागले.

दूध संस्था व दूध संघांच्या नफ्यातून उत्पादक शेतकºयांना दिवाळी सणासाठी दूध रिबेट दिले जाऊ लागले. यंदा ‘गोकुळ’च्या वतीने दूध फरकाच्या रूपाने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांना ऐंशी कोटी रुपये दिले. दूध संस्थांनी आपल्या नफ्यातून एकूण दूध खरेदीच्या ५ ते १८ टक्क्यांपर्यंत रिबेट दिले आहे. ‘गोकुळ’ दूध संघाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे १२८० कोटींची दूध खरेदी केली आहे. सरासरी १० टक्क्यांप्रमाणे रिबेट दिली तरी १२८ कोटी रुपये उत्पादकांना दिले आहे. संघाकडून मिळालेला फरक बहुतांश संस्था मकर संक्रांती व गुढीपाडव्याला देतात. त्यामुळे दिवाळीबरोबरच या दोन्ही सणांत शेतकºयांना हातभार मिळत आहे.‘रिबेट’साठी संस्थांमध्ये स्पर्धागावागावांत राजकारणासाठी दूध संस्थांचे पेव फुटले असले तरी त्याचा फायदा उत्पादकांना झालेला दिसतो. उत्पादकांना सोई-सुविधा देण्यापासून दूध रिबेट देण्यासाठी या संस्थांमध्ये स्पर्धा लागलेली असते. वर्षभरात दूधपुरवठा केलेल्या एकूण रकमेच्या २२ टक्के रिबेट देणाºया संस्था या जिल्ह्यात आहेत.दुधाच्या पैशांवरच बाजारपेठ अवलंबूनपूर्वी उसाचे पैसे आल्यानंतर तीन-चार महिने बाजारपेठेत गर्दी व्हायची. आता दूध व्यवसायामुळे दर दहा दिवसांनी शेतकºयांच्या हातांत पैसे येऊ लागल्याने या पैशांवरच बाजारपेठेतील उलाढाल अवलंबून आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीDiwaliदिवाळी