शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

महात्मा फुले जनआरोग्यमधून ७२६ कोटींचे वितरण, कोल्हापुरातील १ लाख ७१ हजार जणांना झाला फायदा

By समीर देशपांडे | Updated: October 14, 2023 12:55 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : देशभरासह महाराष्ट्रातच एकूणच आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी फारच कमी खर्च होत असल्याचे दिसून येत होते. मात्र ...

समीर देशपांडेकोल्हापूर : देशभरासह महाराष्ट्रातच एकूणच आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी फारच कमी खर्च होत असल्याचे दिसून येत होते. मात्र कोरोनानंतर यामध्ये बदल करावा लागला आणि आता या क्षेत्रावरील खर्च वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना त्यांच्या आजारावर होणारा खर्च सुसह्य व्हावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना २०१२ साली सुरू करण्यात आली. गेल्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ५३८ जणांच्या आजारावर मोफत उपचार करण्यात आले असून यापोटी सरकारी, खासगी रूग्णालयांना तब्बल ७२६ कोटी १३ लाख रूपये अदा करण्यात आले आहेत. म्हणूनच ही योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे.

२०१२ साली ही योजना सुरू झाली तेव्हा रेशन कार्डधारकांना दीड लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात होते. २०१८ पासून केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितपणे फुले योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्र शासनाने २०११ साली झालेल्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण यादीचा आधार घेतला आणि त्यातील नागरिकांना आयुष्मान मधून साडेतीन लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने २०१८ पासून पाच लाखांचे उपचार मोफत होऊ लागले.या यादीपासून अनेकजण वंचित असल्याने अशांना केवळ दीड लाखाचा फायदा होत होता. त्यांना त्यावरील पैसे खिशातून भरावे लागत होते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जुलै २०२३ रोजी आदेश काढून या उर्वरित नागरिकांनाही पाच लाख रूपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या यादीत नसलेल्यांचा समावेश करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अंत्योदय, पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांची ऑनलाइन माहिती भरली जात आहे.याच पद्धतीने कॅन्सर, ह्दय शस्त्रक्रिया, डायलेसिस उपचारासाठी ज्या लाभार्थ्यांनी दीड लाखांची मर्यादा ओलांडली आहे त्यांना नव्या निर्णयानुसार साडेतीन लाखांचा फायदा देण्यास सुरूवात झाली आहे.

जिल्ह्यातील ६५ रूग्णालयांचा समावेशसध्या जिल्ह्यातील ६५ रूग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. यामध्ये ५६ खासगी रूग्णालये असून ९ शासकीय आहेत. २०१२ पासून सहा खासगी रूग्णालये यातून बाहेर पडली आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त रूग्णांकडून पैसे घेतल्याबद्दल ही काही रूग्णालयांवर याआधी कारवाई करण्यात आली आहे.

१२०९ आजारांचा समावेशज्यावेळी ही योजना सुरू झाली तेव्हा खूपच मर्यादित आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता तब्बल १२०९ आजारांवर यातून उपचार करण्यात येतात. आता यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून पांढऱ्या रेशनकार्डधारकांना लाभ देणे, योजनेतील रूग्णालयांची संख्या वाढवणे यावर शासनाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर