शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

हातकणंगले तालुक्यातील ९५ शेतक-यांना 'मिनीकिट'चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढीचा उद्देश विनायक शिंपुकडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक-यांना डाळी व ...

डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढीचा उद्देश

विनायक शिंपुकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक-यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी 'मिनीकिट' कार्यक्रम सुरू केला आहे. ही मिनीकिट राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात असून केंद्र सरकार राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून वित्तपुरवठा करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील जवळपास ९५ शेतक-यांना 'मिनीकिट' चे वाटप करण्यात आले आहे.

शेतक-यांना या योजनेंतर्गत विनामूल्य बियाणे देण्यात आली आहेत. कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मिनीकिट या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शेतक-यांना यापूर्वी केंद्र सरकारच्यावतीने डाळी याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तूर, मूग आणि उडदाचे बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, सन २०१४ व २०१५ पासून तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत आता सोयाबीन आणि भुईमूग याचे बियाणे मोफत दिले जात आहेत.

केंद्र सरकारने खरीप परिषद आयोजित केली होती.

यामध्ये सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी योजना आखण्यात आली. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी आत्मनिर्भर होण्याकरता सोयाबीन आणि भुईमुगाचे बियाणे शेतक-यांना मोफत देण्यासंदर्भात घोषणा केली. खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतक-यांना बियाणे मिळावीत, यासाठी आजतागायत ५० किट वाटप केले असून, जूनअखेरपर्यंत विनाशुल्क ९५ मिनीकिट वाटप केले जाणार आहेत.

तालुक्यात तीन कृषी विभाग

हातकणंगले तालुक्यात वडगाव, हुपरी व हातकणंगले या तीन विभागांच्या माध्यमातून मिनीकिटचे वाटप केले आहे. यामध्ये वडगाव ४०, हुपरी ३० तर हातकणंगले २५ मिनीकिटचे वाटप पेरणीच्या क्षेत्रानुसार करण्यात आले आहे. प्रत्येक मिनीकिटमध्ये २० किलोग्रॅम बियाणांचा समावेश आहे.

बहुआयामी धोरण

तेलबिया व पामतेलवरील राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने खाद्यतेलाची आवश्यकता वाढवणे आणि तेलबिया व पामतेलाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बहुआयामी धोरण अवलंबिले जात आहे.

प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून शेतकºयांना मिनीकिट दिले जात आहे. सरकारने तेल बियाणांवर अधिक भर दिले असून, त्याद्वारे जनजागृतीचे काम सुरू आहे. त्यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मिनीकिटमध्ये उच्च प्रतीचे बियाणे समाविष्ट केले आहेत. यंदा पाऊस चांगल्याप्रकारे झाल्यामुळे व प्रेरणीस अनुकूल असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी.