शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

हातकणंगले तालुक्यातील ९५ शेतक-यांना 'मिनीकिट'चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढीचा उद्देश विनायक शिंपुकडे लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक-यांना डाळी व ...

डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढीचा उद्देश

विनायक शिंपुकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक-यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी 'मिनीकिट' कार्यक्रम सुरू केला आहे. ही मिनीकिट राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात असून केंद्र सरकार राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून वित्तपुरवठा करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील जवळपास ९५ शेतक-यांना 'मिनीकिट' चे वाटप करण्यात आले आहे.

शेतक-यांना या योजनेंतर्गत विनामूल्य बियाणे देण्यात आली आहेत. कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मिनीकिट या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शेतक-यांना यापूर्वी केंद्र सरकारच्यावतीने डाळी याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तूर, मूग आणि उडदाचे बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, सन २०१४ व २०१५ पासून तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत आता सोयाबीन आणि भुईमूग याचे बियाणे मोफत दिले जात आहेत.

केंद्र सरकारने खरीप परिषद आयोजित केली होती.

यामध्ये सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी योजना आखण्यात आली. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी आत्मनिर्भर होण्याकरता सोयाबीन आणि भुईमुगाचे बियाणे शेतक-यांना मोफत देण्यासंदर्भात घोषणा केली. खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतक-यांना बियाणे मिळावीत, यासाठी आजतागायत ५० किट वाटप केले असून, जूनअखेरपर्यंत विनाशुल्क ९५ मिनीकिट वाटप केले जाणार आहेत.

तालुक्यात तीन कृषी विभाग

हातकणंगले तालुक्यात वडगाव, हुपरी व हातकणंगले या तीन विभागांच्या माध्यमातून मिनीकिटचे वाटप केले आहे. यामध्ये वडगाव ४०, हुपरी ३० तर हातकणंगले २५ मिनीकिटचे वाटप पेरणीच्या क्षेत्रानुसार करण्यात आले आहे. प्रत्येक मिनीकिटमध्ये २० किलोग्रॅम बियाणांचा समावेश आहे.

बहुआयामी धोरण

तेलबिया व पामतेलवरील राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने खाद्यतेलाची आवश्यकता वाढवणे आणि तेलबिया व पामतेलाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बहुआयामी धोरण अवलंबिले जात आहे.

प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून शेतकºयांना मिनीकिट दिले जात आहे. सरकारने तेल बियाणांवर अधिक भर दिले असून, त्याद्वारे जनजागृतीचे काम सुरू आहे. त्यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मिनीकिटमध्ये उच्च प्रतीचे बियाणे समाविष्ट केले आहेत. यंदा पाऊस चांगल्याप्रकारे झाल्यामुळे व प्रेरणीस अनुकूल असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी.