शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जि. प. पदाधिकारी मुदतवाढीबद्दल आशावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची ...

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळेल यासाठी प्रचंड आशावादी आहेत. या सर्व परिस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या सहाही पदाधिकाऱ्यांना वर्ष होऊन गेल्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचे सूतोवाच केले होते. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील परदेशातून आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, याच दरम्यान तीनही मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या निवडणुका जाहीर झाल्या.

सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळ आणि राजाराम कारखाना या दोन निवडणुका अतिमहत्त्वाच्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे राजीनामे घेणे, ते मंजूर होणे, मग शिवसेना आणि स्वाभिमानीच्या सभापतींचे राजीनामे घेणे, नव्या निवडीची नावे निश्चित करणे आणि सर्व सदस्यांना एकत्र ठेवत पुन्हा सत्ता स्थापन करणे यासाठी या दोन्ही नेत्यांना वेळ द्यावा लागणार आहे.

अशातच गोकुळ आणि जिल्हा बँकेसाठी इच्छुक असणारेही जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींना वेगवेगळे संदर्भ आहेत. निधी वाटपावरून काही सदस्य नाराज आहेत. या सगळ्याचा फायदा विरोधी गटाला होऊ नये यासाठी पदाधिकारी बदल या निवडणुका झाल्यानंतर होईल असा आशावाद या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

गेल्या निवडीवेळीही गोव्यातून आमदार पी. एन. पाटील गटाचे सदस्य परत कोल्हापुरात आल्यामुळे खळबळ उडाली होती. एकीकडे आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व असलेल्या गोकुळ विरोधात पालकमंत्री पाटील यांनी उघड आघाडी उघडली असल्याने या संघर्षाला वेगळी धार येणार आहे.

चौकट

पी. एन. यांच्या मागणीने गुंता वाढला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आमदार पी. एन. पाटील यांनी भेट घेऊन राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आधीच्या अध्यक्षांचा राजीनामा होण्याआधी राहुल यांच्यासाठी पवार यांच्याकडे शब्द टाकण्यातून पी. एन. पाटील यांनी काही प्रश्न निर्माण करून ठेवल्याचे मानले जाते. बदल केल्यानंतर काँग्रेेसकडेच अध्यक्षपद ठेवायचे असेल तर राहुल पाटील यांनाच हे पद द्यावे लागेल. कारण पी. एन. यांचे राज्यपातळीवर तेवढे वजन आहे. त्यापेक्षा आहे तेच पदाधिकारी ठेवण्याकडे नेत्यांचा कल राहू शकतो.