शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

जि. प. पदाधिकारी मुदतवाढीबद्दल आशावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची ...

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक आणि राजाराम साखर कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळेल यासाठी प्रचंड आशावादी आहेत. या सर्व परिस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या सहाही पदाधिकाऱ्यांना वर्ष होऊन गेल्यामुळे त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचे सूतोवाच केले होते. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील परदेशातून आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, याच दरम्यान तीनही मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या निवडणुका जाहीर झाल्या.

सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळ आणि राजाराम कारखाना या दोन निवडणुका अतिमहत्त्वाच्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे राजीनामे घेणे, ते मंजूर होणे, मग शिवसेना आणि स्वाभिमानीच्या सभापतींचे राजीनामे घेणे, नव्या निवडीची नावे निश्चित करणे आणि सर्व सदस्यांना एकत्र ठेवत पुन्हा सत्ता स्थापन करणे यासाठी या दोन्ही नेत्यांना वेळ द्यावा लागणार आहे.

अशातच गोकुळ आणि जिल्हा बँकेसाठी इच्छुक असणारेही जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींना वेगवेगळे संदर्भ आहेत. निधी वाटपावरून काही सदस्य नाराज आहेत. या सगळ्याचा फायदा विरोधी गटाला होऊ नये यासाठी पदाधिकारी बदल या निवडणुका झाल्यानंतर होईल असा आशावाद या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

गेल्या निवडीवेळीही गोव्यातून आमदार पी. एन. पाटील गटाचे सदस्य परत कोल्हापुरात आल्यामुळे खळबळ उडाली होती. एकीकडे आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व असलेल्या गोकुळ विरोधात पालकमंत्री पाटील यांनी उघड आघाडी उघडली असल्याने या संघर्षाला वेगळी धार येणार आहे.

चौकट

पी. एन. यांच्या मागणीने गुंता वाढला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आमदार पी. एन. पाटील यांनी भेट घेऊन राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आधीच्या अध्यक्षांचा राजीनामा होण्याआधी राहुल यांच्यासाठी पवार यांच्याकडे शब्द टाकण्यातून पी. एन. पाटील यांनी काही प्रश्न निर्माण करून ठेवल्याचे मानले जाते. बदल केल्यानंतर काँग्रेेसकडेच अध्यक्षपद ठेवायचे असेल तर राहुल पाटील यांनाच हे पद द्यावे लागेल. कारण पी. एन. यांचे राज्यपातळीवर तेवढे वजन आहे. त्यापेक्षा आहे तेच पदाधिकारी ठेवण्याकडे नेत्यांचा कल राहू शकतो.