शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

मरणानंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

पट्टणकोडोलीत प्रकार : अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा भाग कुत्र्यांकडून पळविण्याचा प्रकार

पट्टणकोडोली : जीवन संघर्ष करून काहींना मरणानंतरही सरणावर उपेक्षाच वाटयाला येत आहे. पट्टणकोडोली स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांकडून पळवून नेऊन आजूबाजूच्या शेतात टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी जोर धरत आहे.पट्टणकोडोली येथे साडेचार एकर क्षेत्रामध्ये स्मशानभूमी उभारली आहे. मृत्यूनंतर रितीरिवाजाप्रमाणे मृतदेहांचे दहन करून येथे अंत्यसंस्कार केले जातात. तालुका पंचायत व जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीमध्ये दोन मोठे स्मशानशेड बांधले आहेत. या ठिकाणी स्मशानशेडच्या कठड्यावरच मृतदेहांचे दहन केले जायचे. मृतदेह पूर्ण दहन झाल्यानंतरच मृताचे संबंधित लोक घरी परतायचे. सध्या स्मशानशेडमध्ये दोन शवदाहिन्या बसविल्या असून, मृतदेहाचे यावर दहन केले जाते. शवदाहिन्यांमुळे कमी वेळेत व कमी लाकडांमध्ये दहन पूर्ण होते, असा अंदाज केला जात असल्याने मृताचे संबंधित दहन करण्यासाठी आलेले लगेचच घरी परतत आहेत. आजारी माणसाच्या मृतदेहाचे दहन होण्यास विलंब लागतो. तसेच रात्रीच्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना मृताचे संबंधित लोक शक्यतो थांबत नाहीत. परिणामी, असे अर्धवट मृतदेह जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील भटकी कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे काही भाग पळवून नेऊन शेतात टाकत आहेत. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांवर या टोळ््यांकडून हल्लाही करण्याचे प्रकार घडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)स्मशाभूमीचे क्षेत्र साडेचार एकर आहे. यामध्ये अनेकांनी अतिक्रमणेही केली आहेत. या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायतीकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांची कुत्र्यांकडून हेळसांड होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.