शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मरणानंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

पट्टणकोडोलीत प्रकार : अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा भाग कुत्र्यांकडून पळविण्याचा प्रकार

पट्टणकोडोली : जीवन संघर्ष करून काहींना मरणानंतरही सरणावर उपेक्षाच वाटयाला येत आहे. पट्टणकोडोली स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांकडून पळवून नेऊन आजूबाजूच्या शेतात टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी जोर धरत आहे.पट्टणकोडोली येथे साडेचार एकर क्षेत्रामध्ये स्मशानभूमी उभारली आहे. मृत्यूनंतर रितीरिवाजाप्रमाणे मृतदेहांचे दहन करून येथे अंत्यसंस्कार केले जातात. तालुका पंचायत व जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीमध्ये दोन मोठे स्मशानशेड बांधले आहेत. या ठिकाणी स्मशानशेडच्या कठड्यावरच मृतदेहांचे दहन केले जायचे. मृतदेह पूर्ण दहन झाल्यानंतरच मृताचे संबंधित लोक घरी परतायचे. सध्या स्मशानशेडमध्ये दोन शवदाहिन्या बसविल्या असून, मृतदेहाचे यावर दहन केले जाते. शवदाहिन्यांमुळे कमी वेळेत व कमी लाकडांमध्ये दहन पूर्ण होते, असा अंदाज केला जात असल्याने मृताचे संबंधित दहन करण्यासाठी आलेले लगेचच घरी परतत आहेत. आजारी माणसाच्या मृतदेहाचे दहन होण्यास विलंब लागतो. तसेच रात्रीच्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना मृताचे संबंधित लोक शक्यतो थांबत नाहीत. परिणामी, असे अर्धवट मृतदेह जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील भटकी कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे काही भाग पळवून नेऊन शेतात टाकत आहेत. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांवर या टोळ््यांकडून हल्लाही करण्याचे प्रकार घडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)स्मशाभूमीचे क्षेत्र साडेचार एकर आहे. यामध्ये अनेकांनी अतिक्रमणेही केली आहेत. या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायतीकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांची कुत्र्यांकडून हेळसांड होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.