शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनामुळे तंत्रज्ञान बांधापर्यंत

By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST

अजित पवार : भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप

कोल्हापूर : कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहे. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे केले.मेरी वेदर ग्राउंड मैदानावर आयोजित चार दिवसीय भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी अजित पवार यांच्या हस्ते संजिवनी अ‍ॅग्रो फळे व फुले खरेदी-विक्री केंद्र (तमदलगे, ता. शिरोळ) यांना ‘भीमा कृषिरत्न पुरस्कार’ व द्राक्षगुरु वसंतराव माळी (पलूस, जि. सांगली) यांना ‘भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.अजित पवार म्हणाले, काही लोक स्वार्थासाठी अशी प्रदर्शने भरवितात; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी सामाजिक भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून कृषी प्रदर्शन सुरू ठेवले आहे. सध्या शेतीकामासाठी मजूर मिळेनात, अशी स्थिती आहे. ती कमतरता भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी करून घेत त्याचा उपयोग केल्यास मजुरांअभावी काम थांबण्याची वेळ येणार नाही. शेतीला भरपूर पाणी दिले जायचे; परंतु हे चित्र आता बदलू लागले आहे. आता ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याची बचत होऊ लागली असून त्याचा वापर शेतीसाठी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा प्रकारची कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहेत. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून त्याचा लाभदेखील आता दिसत आहे. आपला शेतकरीदेखील हायटेक होत असल्याचे हे चित्र आहे. भीमा कृषी प्रदर्शन त्याला पूरक काम करते. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकप्रकारे धनंजय महाडिक मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून आपण कृषी प्रदर्शन भरवत असून लाखो लोकांना त्याचा फायदा होत आहे. या माध्यमातून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लोकांना होत आहे.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील, अरुंधती महाडिक, करवीर पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने आदी उपस्थित होते. ताज मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. रामराजे कुपेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कृषी व सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळेकृषी आणि सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे आहेत. त्यामुळे राज्याची वाटचाल प्रगतिपथावर राहिली आहे. सरकार व्होडाफोनला ३२००कोटी रुपयांचा करमाफी देते; परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देत नाही, हे कसले ‘अच्छे दिन’ अशा शब्दांत पवार यांनी यावेळी बोचरी टीका केली.