शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

शिवाजी विद्यापीठाचा हा अपमानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 06:41 IST

शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी निधी म्हणून ५० कोटी रुपये देण्याची घोषणा २०१२ मध्ये केली गेली. निधी मात्र मिळत नाही. हा या विद्यापीठाचा अवमानच आहे.

कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ हे बहुजन समाजाच्या शैक्षणिक वाटचालीतील अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने आणि अनेक मान्यवरांच्या इच्छेने हे विद्यापीठ स्थापन झाले. प्रारंभी कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली कार्यक्षेत्र होते. शिवाय कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे ते शैक्षणिक माहेरच आहे. सोलापुरात स्वतंत्र विद्यापीठ झाले. सुमारे पावणेदोनशे महाविद्यालयांचा कारभार पाहणाऱ्या विद्यापीठात अनेक विद्याशाखांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची सोय झाली. या विद्यापीठाचा २०१२ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा झाला. तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी या सुवर्ण महोत्सवी समारंभात हजेरी लावताना सुवर्ण महोत्सवी निधी म्हणून विविध नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. दोन वर्षे तशीच गेली. एक पै देखील विद्यापीठास मिळाली नाही. वारंवार विविध प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. विद्यापीठाने ते सादरही केले; पण निधी काही मिळाला नाही.

सत्तांतर झाले. भाजप आघाडीचे सरकार राज्यात आले. विद्यापीठाचा अनुभव तोच राहिला. निधी देणारच, अशी घोषणा मात्र राज्यकर्त्यांच्या झेंड्यांचे रंग बदलले तरी कायम आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. खोटे बोलणार पण रेटून बोलत राहणार, हा बाणा काही त्यांनी सोडलेला नाही. अजितदादा पवार यांचे वारसदार म्हणून ते शोभून दिसतात.आजवर केवळ ५ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. ४० पैकी उर्वरित ३९ कोटी ४४ लाख रुपये अद्याप द्यायचे आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव अनेक वेळा दाखल करण्यास सांगण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विद्या-पीठाच्या अधिकाºयांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यालाही आता तीन वर्षे झाली. प्रगती शून्यच.दरम्यानच्या काळात विद्यापीठाने स्वनिधीतून काही विभाग सुरू केले. त्यांचा खर्च चालू आहे. या विभागांच्या प्रगतीविषयी सर्वजण गौरवोद्गार काढतात. मध्यंतरी हा उर्वरित सर्व निधी एकदम देता येणे शक्य होणार नाही, म्हणून पाच-दहा कोटी रुपये दरवर्षी याप्रमाणे देण्याचे ठरले. प्रत्यक्षात काही घडलेच नाही. संतापाची बाब ही की, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि पालकांना खोटी आश्वासने देऊन सरकार फसवीत आहे, याचा कोणालाही संताप येताना दिसत नाही. ऊठसूट आंदोलने करणारे, अनेक अस्मितांचे फलक फडकविणारे, धर्माच्या संरक्षणाची भाषा करणारे, सतत लोक कल्याणाची भाषा करणारे, जनतेचे कैवारी नेते यापैकी कोणीही ब्र शब्द काढत नाहीत. भावी पिढीसाठी उच्च शिक्षणाचे शिवाजी विद्यापीठाचे प्रांगण विकसित व्हावे, असे कुणालाच वाटत नाही. हा विद्यापीठाचा अपमानच आहे.- वसंत भोसले 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठ