शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

राजकारण्यांनीच काम अडविल्याची जनतेत चर्चा

By admin | Updated: August 22, 2014 22:47 IST

किल्ले रसाळगड : मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने शिवप्रेमी नाराज

खेड -- श्रीकांत चाळके --तालुक्यातील किल्ले रसाळगडावर जाण्यास शिवप्रेमींना मोकळीक मिळावी, यासाठी रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २१ फेब्रुवारी २०१४ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पाच महिने उलटल्यानंतरही पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. १० लाख रूपये खर्चाचे हे काम आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप हे काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी ‘क’ वर्ग पर्यटन विकास या योजनेअंतर्गत घेरारसाळगड रस्ता आणि गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिर येथे स्वागत कमान उभारण्याच्या २४ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हे काम ८०० मीटर अंतराचे आहे.पायथ्यापर्यंत जाणारा हा रस्ता घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी या वाड्यांसाठीही जोडण्यात येणार आहे़ हा रस्ता वन विभागाच्या मालकीच्या जमिनीतून जाणार असल्याने वन विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे. हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार आहे़ आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक होते़ मात्र, प्रत्यक्षात या कामाला सुरूवात झालेली नाही. गडाच्या दुरूस्तीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही ते अर्धवट स्थितीत असल्याने शिवप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरातत्व आणि वन विभागाचे अधिकारी या कामाबाबत वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने याविषयी आजही संभ्रम असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. गडावरील ऐतिहासिक गोष्टींचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. गडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या या रस्त्यामुळे घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी यांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली. दरम्यान, हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक असल्याने तसे प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे़