शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

राजकारण्यांनीच काम अडविल्याची जनतेत चर्चा

By admin | Updated: August 22, 2014 22:47 IST

किल्ले रसाळगड : मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने शिवप्रेमी नाराज

खेड -- श्रीकांत चाळके --तालुक्यातील किल्ले रसाळगडावर जाण्यास शिवप्रेमींना मोकळीक मिळावी, यासाठी रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २१ फेब्रुवारी २०१४ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पाच महिने उलटल्यानंतरही पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. १० लाख रूपये खर्चाचे हे काम आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप हे काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी ‘क’ वर्ग पर्यटन विकास या योजनेअंतर्गत घेरारसाळगड रस्ता आणि गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिर येथे स्वागत कमान उभारण्याच्या २४ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हे काम ८०० मीटर अंतराचे आहे.पायथ्यापर्यंत जाणारा हा रस्ता घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी या वाड्यांसाठीही जोडण्यात येणार आहे़ हा रस्ता वन विभागाच्या मालकीच्या जमिनीतून जाणार असल्याने वन विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे. हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार आहे़ आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक होते़ मात्र, प्रत्यक्षात या कामाला सुरूवात झालेली नाही. गडाच्या दुरूस्तीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही ते अर्धवट स्थितीत असल्याने शिवप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरातत्व आणि वन विभागाचे अधिकारी या कामाबाबत वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने याविषयी आजही संभ्रम असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. गडावरील ऐतिहासिक गोष्टींचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. गडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या या रस्त्यामुळे घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी यांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली. दरम्यान, हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक असल्याने तसे प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे़