शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पीककर्जाची माहिती पोहोचवा

By admin | Updated: November 20, 2015 00:31 IST

आढावा बैठक : दादा भुसेंचे अधिकाऱ्यांना आवाहन; प्राधान्याने कर्ज देण्याचा विचार करा

कोल्हापूर : टंचाईची परिस्थिती असल्यामुळे पीककर्जाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत. पुढच्या पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनासाठी कर्ज देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी येथे केले.राजारामपुरी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) हर्षवर्धन चव्हाण, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा येथील सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पहिल्या वर्र्षी कर्जाचे व्याज शासन भरेल, त्यानंतर पुढील वर्षाचे कर्जाचे व्याज शेतकऱ्यांकडून निम्मे व शासनामार्फत निम्मे भरले जाईल. न्यायालयाने दिलेल्या सूचना तसेच अस्तित्वातील शासन निर्णयाप्रमाणे ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींची रक्कम परत करण्यासाठी योग्य नियोजन करावे. शासनाने दिलेल्या रकमेच्या परताव्याची स्थिती, न्यायप्रविष्ट प्रकरणांची स्थिती, अन्य प्रकरणे यांचाउपनिबंधक महेश काकडे यांनी स्वागत केले. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक बी. बी. यादव, साताराचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक जी. बी. वाघ, सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तालुका उपनिबंधक उपस्थित होते. (प्रतिनिधी)कर्जमुक्त करा --शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनार्थ विविध संस्थांकडून कर्ज दिले जाते. या कर्जाच्या रकमेइतकी व्याजाची परतफेड झाली असल्यास त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या मुद्दलाइतक्या रकमेची परतफेड झालेली असल्यास सहकार कायद्यातील कलम ४४ प्रमाणे त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे.