शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

थकीत संस्था कार्यकर्त्यांच्याच : व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न गरजेचे

राजाराम लोंढे - कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या जबाबदारी निश्चितीच्या कारवाईतून वाचण्यासाठी थकीत संस्थांकडील वसुलीबाबत माजी संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विना व अपुऱ्या तारणाने कर्जवाटप केलेल्या संस्था या संचालकांशी संबंधित अथवा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असल्याने वसुलीसाठी त्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्याजाने या रकमा फुगल्या असल्या तरी व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न करून ही रक्कम कमी करून घेता येऊ शकते. बॅँकेच्या चौकशीत २८ संस्थांकडील कर्ज हे असुरक्षित कर्ज म्हणून स्पष्ट झाले. या संस्था पाहिल्या तर बहुतांश माजी संचालकांच्या, तर काही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, मयूर सहकारी वाहतूक संस्था, महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन, एस. के. पाटील को-आॅप. बॅँक, उदयसिंगराव गायकवाड सहकारी ऊसतोडणी संस्था, कोल्हापूर जिल्हा खरेदी-विक्री संघ, विजयमाला देसाई ऊसतोडणी वाहतूक पूरक व्यवसाय संस्था, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था अशा संस्था थेट संचालकांशी संबंधित आहेत; तर उर्वरित संस्था या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या संस्थांना कर्ज देण्यासाठी संचालकांनीच शिफारस केलेली आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी संचालकांनी नियम डावलून कर्जवाटप केले; पण आता संचालकांच्या गळ्याला फास लागल्याने त्या संस्थाचालकांनीही सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. संचालकांनी संबंधित संस्थांच्या संचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्याची विनंती केली, तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो. संचालकांनी थेट संबंधित संस्थाचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्याजाने कर्जाच्या रकमा फुगल्या आहेत. एन. पी. ए.मध्ये गेल्यापासून त्यावरील व्याज आकारणी बंद झाली आहे. त्यामुळे शासनाकडे सामूहिक प्रयत्न करून, व्याजात थोडी सवलत घेऊन कर्ज भरण्याची तयारी संस्थांनी दाखविली पाहिजे. (समाप्त) वाटायला संचालक, मार खायला कर्मचारी !संचालकांनी आपल्या राजकीय सोयीसाठी विनातारण व कागदावरील संस्थांना कर्जपुरवठा करायचा आणि त्याच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी डोकी फोडून घ्यायची का? ‘दौलत’सह अनेक संस्थांच्या कर्जवसुलीवरून कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी कर्ज दिले त्यांनाच चांगल्या प्रकारे त्याची वसुलीही करता येईल, असा कर्मचाऱ्यांमधून सूर आहे.