शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

थकीत संस्था कार्यकर्त्यांच्याच : व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न गरजेचे

राजाराम लोंढे - कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या जबाबदारी निश्चितीच्या कारवाईतून वाचण्यासाठी थकीत संस्थांकडील वसुलीबाबत माजी संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विना व अपुऱ्या तारणाने कर्जवाटप केलेल्या संस्था या संचालकांशी संबंधित अथवा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असल्याने वसुलीसाठी त्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्याजाने या रकमा फुगल्या असल्या तरी व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न करून ही रक्कम कमी करून घेता येऊ शकते. बॅँकेच्या चौकशीत २८ संस्थांकडील कर्ज हे असुरक्षित कर्ज म्हणून स्पष्ट झाले. या संस्था पाहिल्या तर बहुतांश माजी संचालकांच्या, तर काही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, मयूर सहकारी वाहतूक संस्था, महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन, एस. के. पाटील को-आॅप. बॅँक, उदयसिंगराव गायकवाड सहकारी ऊसतोडणी संस्था, कोल्हापूर जिल्हा खरेदी-विक्री संघ, विजयमाला देसाई ऊसतोडणी वाहतूक पूरक व्यवसाय संस्था, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था अशा संस्था थेट संचालकांशी संबंधित आहेत; तर उर्वरित संस्था या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या संस्थांना कर्ज देण्यासाठी संचालकांनीच शिफारस केलेली आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी संचालकांनी नियम डावलून कर्जवाटप केले; पण आता संचालकांच्या गळ्याला फास लागल्याने त्या संस्थाचालकांनीही सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. संचालकांनी संबंधित संस्थांच्या संचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्याची विनंती केली, तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो. संचालकांनी थेट संबंधित संस्थाचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्याजाने कर्जाच्या रकमा फुगल्या आहेत. एन. पी. ए.मध्ये गेल्यापासून त्यावरील व्याज आकारणी बंद झाली आहे. त्यामुळे शासनाकडे सामूहिक प्रयत्न करून, व्याजात थोडी सवलत घेऊन कर्ज भरण्याची तयारी संस्थांनी दाखविली पाहिजे. (समाप्त) वाटायला संचालक, मार खायला कर्मचारी !संचालकांनी आपल्या राजकीय सोयीसाठी विनातारण व कागदावरील संस्थांना कर्जपुरवठा करायचा आणि त्याच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी डोकी फोडून घ्यायची का? ‘दौलत’सह अनेक संस्थांच्या कर्जवसुलीवरून कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी कर्ज दिले त्यांनाच चांगल्या प्रकारे त्याची वसुलीही करता येईल, असा कर्मचाऱ्यांमधून सूर आहे.