शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

थकीत संस्था कार्यकर्त्यांच्याच : व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न गरजेचे

राजाराम लोंढे - कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या जबाबदारी निश्चितीच्या कारवाईतून वाचण्यासाठी थकीत संस्थांकडील वसुलीबाबत माजी संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विना व अपुऱ्या तारणाने कर्जवाटप केलेल्या संस्था या संचालकांशी संबंधित अथवा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असल्याने वसुलीसाठी त्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्याजाने या रकमा फुगल्या असल्या तरी व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न करून ही रक्कम कमी करून घेता येऊ शकते. बॅँकेच्या चौकशीत २८ संस्थांकडील कर्ज हे असुरक्षित कर्ज म्हणून स्पष्ट झाले. या संस्था पाहिल्या तर बहुतांश माजी संचालकांच्या, तर काही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, मयूर सहकारी वाहतूक संस्था, महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन, एस. के. पाटील को-आॅप. बॅँक, उदयसिंगराव गायकवाड सहकारी ऊसतोडणी संस्था, कोल्हापूर जिल्हा खरेदी-विक्री संघ, विजयमाला देसाई ऊसतोडणी वाहतूक पूरक व्यवसाय संस्था, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था अशा संस्था थेट संचालकांशी संबंधित आहेत; तर उर्वरित संस्था या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या संस्थांना कर्ज देण्यासाठी संचालकांनीच शिफारस केलेली आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी संचालकांनी नियम डावलून कर्जवाटप केले; पण आता संचालकांच्या गळ्याला फास लागल्याने त्या संस्थाचालकांनीही सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. संचालकांनी संबंधित संस्थांच्या संचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्याची विनंती केली, तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो. संचालकांनी थेट संबंधित संस्थाचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्याजाने कर्जाच्या रकमा फुगल्या आहेत. एन. पी. ए.मध्ये गेल्यापासून त्यावरील व्याज आकारणी बंद झाली आहे. त्यामुळे शासनाकडे सामूहिक प्रयत्न करून, व्याजात थोडी सवलत घेऊन कर्ज भरण्याची तयारी संस्थांनी दाखविली पाहिजे. (समाप्त) वाटायला संचालक, मार खायला कर्मचारी !संचालकांनी आपल्या राजकीय सोयीसाठी विनातारण व कागदावरील संस्थांना कर्जपुरवठा करायचा आणि त्याच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी डोकी फोडून घ्यायची का? ‘दौलत’सह अनेक संस्थांच्या कर्जवसुलीवरून कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी कर्ज दिले त्यांनाच चांगल्या प्रकारे त्याची वसुलीही करता येईल, असा कर्मचाऱ्यांमधून सूर आहे.