शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘थेट पाईपलाईन’चे अडथळे अखेर दूर

By admin | Updated: November 5, 2015 01:05 IST

‘वन्यजीव’ची मान्यता : राजापूरजवळ जॅकवेल, पंप हाऊस उभारण्याचा मार्ग खुला

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या अनुषंगाने काळम्मावाडी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या जॅकवेल, पंप हाऊस, विद्युत सबस्टेशनच्या कामास राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाने बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्यातील मुख्य अडथळे आता दूर झाले. ही सर्व कामे २०१६ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे.योजनेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेल, पंप हाऊस, विद्युत सबस्टेशन उभारण्याच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या दहा महिन्यांपासून या कामास मान्यता मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत होते. मान्यतेसंबंधीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने जानेवारी महिन्यात वन्यजीव महामंडळाकडे पाठविला होता. तत्पूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांच्या मान्यता घेऊन हा प्रस्ताव नागपूर येथील वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्याकडून कामाची छाननी झाली होती. दोन दिवसांपूर्वी मनपाचे मुख्य जलअभियंता मनीष पवार व शाखा अभियंता अजय साळुंखे नागपूरला गेले होते तेथून प्रस्ताव घेऊन दिल्लीला गेले. बुधवारी दुपारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकरही उपस्थित होते. या बैठकीत महानगरपालिकेचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यातील एक वर्ष मान्यता मिळविण्यातच गेली. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे या मान्यता मिळवून देण्याच्या कामात थोडे राजकीय पातळीवर दुर्लक्ष झाले होते. मात्र, मनपा प्रशासनाने त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.आता फक्त दोन परवानग्या प्रलंबित आता केवळ दोन परवानगी मिळणे बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ३.५० किलोमीटर्स अंतरातील रस्त्याच्या बाजूने तर पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या ११ किलोमीटर्स अंतरातील रस्त्याच्या बाजूने पाईप घालण्यात येणार असून, त्याची मान्यता मिळणे बाकी राहिले आहे; परंतु ही मान्यता मिळविण्याचा विषय हा राज्य सरकारशी संबंधित असल्याने तीही मान्यता लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील वन्यजीव महामंडळाने मान्यता दिल्याने पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्य जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचीही एक परवानगी आठ दिवसांपूर्वीच मिळाली आहे. बांधकाम विभागाच्या मालकीच्या २९ किलोमीटर्स इतक्या रस्त्याच्या बाजूने पाईप घालण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मान्यतेचा प्रस्तावही प्रलंबित होता. आक्षेपाविना ‘वन्यजीव’ची मंजुरीकाळम्मावाडी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या राजापूर गावाजवळ जॅकवेल, पंप हाऊस आणि विद्युत सबस्टेशन उभारायचे आहे. तेथून धरण क्षेत्रात २०० मीटर अंतर आतमध्ये पाईपलाईन टाकून जॅकवेलमध्ये पाणी घ्यायचे आहे. या कामासाठी १.३१ हेक्टर जागा संपादन करावी लागणार आहे. ही जागा वन्यजीव विभागाची आहे. त्यासाठी ही मान्यता लागणार होती. महापालिकेने दिलेल्या प्रस्तावावर कोणताही आक्षेप न घेता वन्यजीव महामंडळाने त्यास मान्यता दिली.