शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना थेट मदत द्यावी - आमदार डाॅ. विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

वारणानगर : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी ...

वारणानगर : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी तसेच वादळी वाऱ्यामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन त्यांनादेखील नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डाॅ. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

तसेच जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन झालेल्या नुकसानीबद्दल चर्चा केली.

दि.१५ मे पासून तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला जोरदार फटका बसला आहे. तसेच जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवनदेखील विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक उद्योग-धंदे मोडकळीस आले असून, कोरोनाचे आणखी मोठे संकट राज्यावर आले आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठी पडझड झाल्याचे चित्र आहे. मच्छिमारांच्या बोटींचे तसेच किनाऱ्यालगत असणाऱ्या वस्तीचे मोठे नुकसान झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली.

फोटो ओळी- तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टीसह राज्यातील शेतकरी नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.