शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नुकसानग्रस्तांना थेट मदत द्यावी - आमदार डाॅ. विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

वारणानगर : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी ...

वारणानगर : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी तसेच वादळी वाऱ्यामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन त्यांनादेखील नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डाॅ. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

तसेच जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन झालेल्या नुकसानीबद्दल चर्चा केली.

दि.१५ मे पासून तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला जोरदार फटका बसला आहे. तसेच जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवनदेखील विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक उद्योग-धंदे मोडकळीस आले असून, कोरोनाचे आणखी मोठे संकट राज्यावर आले आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठी पडझड झाल्याचे चित्र आहे. मच्छिमारांच्या बोटींचे तसेच किनाऱ्यालगत असणाऱ्या वस्तीचे मोठे नुकसान झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली.

फोटो ओळी- तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टीसह राज्यातील शेतकरी नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.