शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ-समरजित यांच्यातच थेट लढत

By विश्वास पाटील | Updated: August 7, 2024 18:32 IST

समरजित तुतारी फुंकण्याची शक्यता ठळक; संजय घाटगे यांची अनाकलनीय माघार

विश्वास पाटीलकोल्हापूर : उद्धवसेनेचे नेते व माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच तलवार म्यान केल्यामुळे कागल मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातच थेट कुस्ती होण्याची शक्यता ठळक झाली आहे. समरजित यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी फुंकण्याची ऑफर आहे. त्यांनी तसा निर्णय घेतला तर या लढतीला वेगळीच धार येणार आहे. त्यांनी भाजप प्रेमापोटी अपक्ष लढायचे ठरवल्यास महाविकास आघाडीला या मतदारसंघात आजच्या घडीला तरी उमेदवारच नाही. समरजित यांनी सोमवारी मुरगूडमध्ये आपण लढणार हे नक्की आहे, एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हीच उत्सुकता आहे, असे म्हटले आहे. याचा अर्थ ते अपक्ष नव्हे तर कोणत्या तरी पक्षाकडूनच लढतील हे स्पष्टच आहे. आणि त्यांच्यापुढे महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्यायच नाही.समरजित घाटगे यांची भाजपच्या राज्य नेतृत्वाशी अत्यंत जवळीक आहे. संघटनेतही त्यांना चांगले स्थान आहे. त्यामुळे ते भाजपला सोडून तुतारी फुंकतील का, अशीही साशंकता लोकांच्या मनात आहे. परंतु अपक्ष लढून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा हे घडणार नाही. कारण त्यात आघाडीचा काय फायदा नाही. त्यामुळे एकतर त्यांना आघाडीची उमेदवारी घ्यावी लागेल किंवा मग तिरंगी लढत होईल. संजय घाटगे नाही म्हटल्याने आघाडीला ताकदीचा उमेदवार शोधावा लागेल. 

  • कागलच्या आजपर्यंतच्या लढतीत जेव्हा लढत तिरंगी होते तेव्हाच ती मुश्रीफ यांना सोपी जाते, दुरंगी लढतीत त्यांचा कस लागतो हे माहीत असतानाही संजय घाटगे यांची माघार होणे आणि त्याचे मुश्रीफ यांनी स्वागत करणे यामागील त्यांचे गणित काय असेल याबद्दल नक्कीच उत्कंठा आहे.
  • गेल्या निवडणुकीत याच मुश्रीफ यांनी शिवसेनेची उमेदवारी समरजित घाटगे यांना मिळणार नाही आणि तिथे संजय घाटगे हेच त्या पक्षाकडून कसे रिंगणात राहतील यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून जोडण्या लावल्या व त्याचा परिणाम निकालात दिसला. त्याच मुश्रीफ यांची या निवडणुकीतील भूमिका मात्र त्याच्या उलटी आहे.
  • संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला म्हणून त्यांचा सगळाच गट जसाच्या तसा मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील ही शक्यता धूसर आहे. निवडणुकीत तसे होत नाही आणि घाटगे यांना पडलेली मते जरी त्यांना मानणारी असली तरी त्यामध्ये शिवसेनेची ताकद हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
  • लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांना कागलने चांगले मतदान दिले. त्यांच्या प्रचारात अंबरीश घाटगे सक्रिय होते. त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असाही एक प्रवाह होता. परंतु वडिलांनी आधीच हात वर केल्याने अंबरीश हेदेखील पाच वर्षे मागे गेले. शिवाय महाविकास आघाडीत राहून त्यांना मुश्रीफ यांना मदत करता येणार नाही. मग एकतर शिंदेेसेना किंवा भाजप हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतील.
  • मुश्रीफ यांच्याकडून लाभ घेऊन त्यांना लढत सोपी व्हावी म्हणून मी लढतो हा शिक्का पुसण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचे संजय घाटगे सांगतात, परंतु कुणी किती लाभ दिला आणि किती घेतला हे जाहीर सभेत शपथेवर सांगितले म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि तुम्ही लोकांशी, भूमिकेशी प्रामाणिक होता म्हणूनच ५५ हजार लोकांनी तुम्हाला मते दिली, कार्यकर्त्यांनी हाडाची काडे केली हे त्यांनी अव्हेरू नये.. या मतांचे मोल मोठे आहे.
  • भाजपच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाला केंद्रीय नेतृत्वाकडून काही प्रमाणात शह दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत ते जसे अपक्षांच्या मागे राहिले तसे राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनीच तुम्हाला आमदार व्हायचे असेल तर तुमचा पक्ष तुम्ही निवडा अशा स्वरूपाची लाइन समरजित, चंदगडच्या शिवाजीराव पाटील यांना क्लेअर करून दिल्याचे समजते. त्यामुळेच समरजित हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या घडामोडी आहेत.
  • राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मुश्रीफ त्यांना सोडून गेल्याचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयोग त्यांनी लोकसभेत केला व त्याचा लक्षणीय फायदा झाला. तसाच प्रयोग ते या मतदारसंघातही करू इच्छितात. त्यांच्याबद्दल कागलमध्ये नक्कीच क्रेझ आहे. तशा हालचाली असल्यानेच मुश्रीफ यांनी सावध होऊन जोडण्या सुरू केल्याचे समजते.
  • तालुक्यातील चौथा महत्त्वाचा गट असलेल्या माजी खासदार मंडलिक गटाची भूमिका अजून स्पष्ट नाही. परंतु लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांत जे सोशल वॉर झाले त्यावरून या गटाच्या भूमिकेबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. ठंडा करके खावो असे सध्यातरी त्यांचे धोरण आहे. परंतु या गटाचे धोरण काही ठरले तरी त्यांचे बरेचसे कार्यकर्ते मुश्रीफ यांनी विविध कामातून आपल्याशी जोडून ठेवले आहेत हे नाकारता येत नाही.

दुरंगी-तिरंगी लढतीतील फरकयापूर्वीच्या लढतीत १९९८ ला पोटनिवडणुकीत संजय घाटगे ६६०० मतांनी विजयी झाले. मुश्रीफ १९९९ला २८८१, नंतर २००४ ला ११२५, त्यानंतर २०१४ ला ५९३४ मतांनी विजयी झाले. आणि २००९ ला तिरंगी लढत झाल्यावर ते तब्बल ४६,४१२ तर २०१९ ला २८,१३२ मतांनी विजयी झाले आहेत.

विधानसभा २०१९ चा निकाल

  • हसन मुश्रीफ- राष्ट्रवादी काँग्रेस-१,१६,४३४
  • समरजित घाटगे-अपक्ष - ८८,३०२
  • संजय घाटगे-शिवसेना - ५५,६५७.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे