शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

बोरवडेच्या उजव्या कालव्यावरील जीर्ण पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 15:08 IST

पर्यायी सोय नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा 

दत्ता लोकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, सरवडे : बोरवडे ( ता. कागल ) येथील हद्दीत गावच्या डोंगर भागात शेतीच्या कामांनी व वरील पिकवलेला ऊस ने आण करण्यासाठी हा पूल अत्यंत उपयोगी होता.तो पुल आज रविवारी सकाळी कोसळला. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पुल धोकादायक बनला होता.यासंबंधी वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज पुलाचा पिलर कोसळत पूल वाहत्या पाण्यात ढासळला. यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल  होणार आहेत. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पुल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सन १९८७ ला ३५  वर्षांपूर्वी पुल उभारला होता. या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरुनच वाहतुक करावी लागते. कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र आहे या विभागात सुमारे ४० हजार टन ऊस कारखान्यांना जातो.या पुलावरुन ऊसाची वाहतुक सुरु असते.

दोन वर्षांपासून या  पुलाच्या पिलरचे दगड निखळून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी येथे नवीन पुल उभारण्याची मागणी केली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने हा पुल आज पडला. यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दूरवर १० कि.मी अंतरावरून  मुदाळ तिट्टा येथील पुलावरुन ये-जा करावी लागणार असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी नवीन पुल तात्काळ उभारावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला

या कालव्यावरुन सकाळी ट्रँक्टरमध्ये महिला बसून भेतीच्या कामासाठी निघाल्या होत्या. तो पुढे गेला आणि मागून मोकळा ट्रँक्टर जात असताना पूल कोसळला गावकऱ्यांनी ट्रँक्टर बाहेर काढला त्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर