शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या चुकांमुळे मराठा आरक्षणाला अडचणी

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सुरेश पाटील : आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरणार

सांगली : अशासकीय समिती नियुक्त करतानाच आयोगाच्या शिफारसींचा विचार न करता मराठा आरक्षणाचा अहवाल तयार केल्यामुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले, असे मत मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली. राणे समितीच्या अहवालासाठी आयोगाच्या शिफारसींची गरज होती. तांत्रिक चुकांमुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले. कॉँग्रेस आघाडी सरकारने निवडणुका डोळ््यासमोर ठेवून घाईगडबडीत आरक्षण दिले होते. त्यामुळे आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते यात यशस्वी झाले. न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्रुटींबाबत ठोस बाजू सरकारला मांडता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने शासनाची आव्हान याचिकाही फेटाळली. आता पुन्हा न्यायालयीन लढाईत सक्षमपणे हा प्रश्न मांडण्यासाठी वकिलांचे एक पॅनेल आम्ही तयार केले आहे. त्यामाध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान सरकारने नेमलेल्या वकील पॅनेलमधील अ‍ॅड. रवींद्र आडसुरे यांच्या हटवादी भूमिकेचाही फटका आरक्षणाच्या प्रश्नाला बसत आहे. त्यामुळे आम्ही वकील बदलण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय राजस्थान सरकारने गुज्जरांसह विशेष मागास वर्गासाठी पाच टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी १४ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे. राजस्थान सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा तोडण्याचे धाडस दाखवावे लागेल. दाखले काढलेल्या मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या अखत्यारित मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यावी किंवा शिष्यवृत्ती जाहीर करावी. अन्य मागासवर्गीय महामंडळांना मोठ्या निधीची तजवीज केली जात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तुटपुंजा निधी देण्यात येत आहे. त्यास निधी वाढवून द्यावा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ््याची उभारणी करावी, खुल्या प्रवर्गातील जागा भराव्यात, आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे, भरत पाटील, प्रताप पाटील, रमेश पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)