शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सतेज पाटील यांची महाडिक यांना धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:37 IST

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड

ठळक मुद्दे‘दक्षिण’चे राजकारण तापणार मोठ्या गावांत सत्ता मिळविली

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड दिला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाचगाव ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटाने घवघवीत यश मिळवून बदललेल्या राजकारणाची चुणूक दाखवून दिली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार पाटील यांची पीछेहाट झाली होती. ‘हुकमी’ म्हणता येतील अशा उचगाव व पाचगाव जिल्हा परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला दोन जागा कमी पडल्या व त्याचा परिणाम काँग्रेसची जिल्हा परिषदेची सत्ता हातातून निसटली. त्या पराभवाचा वचपा पाटील गटाने या निवडणुकीत काढल्याचे चित्र दिसत आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निकाल फिरविण्याची ताकद असलेल्या पाचगाव व उचगाव या गावांत त्यांनी सरपंचपदासह सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही लक्षवेधी होणार असल्याचे बीजारोपण निकालाने केले.पाचगावच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी सरपंचपदासह सदस्यपदाच्या १७ पैकी १५ जागा जिंकल्या.

उचगावमध्येही सरपंचासह सत्ता मिळवली. याशिवाय चुये, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, दºयाचे वडगांव, नेर्ली, सरनोबतवाडी, कणेरीवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, नागाव सरपंचपदासह ग्रामपंचायतींची सत्ताही पाटील गटाने खेचून घेतली. काही गावांत काँग्रेसच्याच दोन गटांत निवडणूक झाली आहे.शिरोलीतही केला पराभव..शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गावातही सतेज पाटील यांनी दोन खवरे बंधूंमध्ये मनोमिलन करून गावची सत्ताही आपल्याकडे खेचली. या गावात त्यांचे नेतृत्व मानणारे शशिकांत खवरे सरपंच झाले, तर ९ सदस्य जिंकून या ग्रामपंचायतीत सत्ता मिळवताना पाटील यांनी महाडिक गटाला चांगलाच शह दिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच त्यांनी दोन खवरे गटांत समझोता घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते; परंतु त्यावेळी त्यांना त्यात यश आले नव्हते.हा पराभव म्हणजे महाडिक गटाला मोठा धक्का मानला जातो.परप्रांतीय महाडिक हद्दपार..पुलाची शिरोलीच्या निवडणुकीत मूळच्या शिरोलीकरांनी परप्रांतीयांना अस्मान दाखविल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महाडिक यांना लगावला. ते म्हणाले, ‘सारा जिल्हा माझ्या ताब्यात आहे,’ असा आव आणणाºयांचा जनतेने त्यांच्या घरातच पराभव केला आहे. आपण काहीही केले तर लोक खपवून घेतात, याला ही चपराक आहे. महाडिकांच्या राजकारणाला ओहोटी लागल्याचेच शिरोलीकरांनी यातून दाखवून दिले आहे.