शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सतेज पाटील यांची महाडिक यांना धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:37 IST

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड

ठळक मुद्दे‘दक्षिण’चे राजकारण तापणार मोठ्या गावांत सत्ता मिळविली

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १९ पैकी तब्बल १३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांना धोबीपछाड दिला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाचगाव ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटाने घवघवीत यश मिळवून बदललेल्या राजकारणाची चुणूक दाखवून दिली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार पाटील यांची पीछेहाट झाली होती. ‘हुकमी’ म्हणता येतील अशा उचगाव व पाचगाव जिल्हा परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला दोन जागा कमी पडल्या व त्याचा परिणाम काँग्रेसची जिल्हा परिषदेची सत्ता हातातून निसटली. त्या पराभवाचा वचपा पाटील गटाने या निवडणुकीत काढल्याचे चित्र दिसत आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निकाल फिरविण्याची ताकद असलेल्या पाचगाव व उचगाव या गावांत त्यांनी सरपंचपदासह सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही लक्षवेधी होणार असल्याचे बीजारोपण निकालाने केले.पाचगावच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी सरपंचपदासह सदस्यपदाच्या १७ पैकी १५ जागा जिंकल्या.

उचगावमध्येही सरपंचासह सत्ता मिळवली. याशिवाय चुये, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, दºयाचे वडगांव, नेर्ली, सरनोबतवाडी, कणेरीवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, नागाव सरपंचपदासह ग्रामपंचायतींची सत्ताही पाटील गटाने खेचून घेतली. काही गावांत काँग्रेसच्याच दोन गटांत निवडणूक झाली आहे.शिरोलीतही केला पराभव..शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गावातही सतेज पाटील यांनी दोन खवरे बंधूंमध्ये मनोमिलन करून गावची सत्ताही आपल्याकडे खेचली. या गावात त्यांचे नेतृत्व मानणारे शशिकांत खवरे सरपंच झाले, तर ९ सदस्य जिंकून या ग्रामपंचायतीत सत्ता मिळवताना पाटील यांनी महाडिक गटाला चांगलाच शह दिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच त्यांनी दोन खवरे गटांत समझोता घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते; परंतु त्यावेळी त्यांना त्यात यश आले नव्हते.हा पराभव म्हणजे महाडिक गटाला मोठा धक्का मानला जातो.परप्रांतीय महाडिक हद्दपार..पुलाची शिरोलीच्या निवडणुकीत मूळच्या शिरोलीकरांनी परप्रांतीयांना अस्मान दाखविल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महाडिक यांना लगावला. ते म्हणाले, ‘सारा जिल्हा माझ्या ताब्यात आहे,’ असा आव आणणाºयांचा जनतेने त्यांच्या घरातच पराभव केला आहे. आपण काहीही केले तर लोक खपवून घेतात, याला ही चपराक आहे. महाडिकांच्या राजकारणाला ओहोटी लागल्याचेच शिरोलीकरांनी यातून दाखवून दिले आहे.