शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 6, 2014 00:40 IST

भर पावसात मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी

कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसात ‘यळकोट यळकोट जय मल्हार...बिरोबाच्या नावानं चांगभलं...’या जयघोषासह धनगर वाद्यांच्या गजरात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून आलेले दीड हजारांहून अधिक धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळे झेंडे, कपाळी भंडारा, पिवळ्या टोप्या त्यावर दोन्ही बाजूला मी धनगर व ‘एसटी’ आरक्षण मिळालेच पाहिजे, असे घोषवाक्य. धनगरी ढोल व कैताळांचा आवाज अशा वातावरणात निघालेल्या मोर्चात धनगर बांधवांची संख्या लक्षणीय होती. घोषणाबाजी करत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यातच भर पावसातही आंदोलकांचा उत्साह दांडगा होता. या ठिकाणी धनगर समाजातील मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.समाजशास्त्रज्ञ ईरावती कर्वे आणि मानवशास्त्रज्ञ कोलनल डेलस्टॉन यांनी केलेल्या संशोधनानुसार १८७२ पासून धनगर समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज अत्यंत मागास असल्याचे वर्णन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड जमात एकच असून, आम्हाला इतरांचे काढून आरक्षण नको आहे. घटनेने दिलेले अनुसूचित जमातींच्या सूचितील हक्काचे आरक्षण हवे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात बाबूराव हजारे, अशोकराव कोळेकर, विलासराव वाघमोडे, नगरसेवक सत्यजित कदम, रामभाऊ डांगे, बाबासाहेब सावगावे यांच्यासह धनगर बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)