शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

दूधगंगा धरणग्रस्तांची ‘झाडाझडती’

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

धरणग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा : शासनाकडून अतिरिक्त जमिनी वाटप झाल्याच्या नोटिसा

जहाँगीर शेख-कागल -दूधगंगा प्रकल्पासाठी विस्थापित होऊन ३० वर्षांचा काळ लोटल्यानंतर या धरणग्रस्त विस्थापितांना शासनाकडून पूर्णपणे पर्यायी जमीन उपलब्ध करून देता आलेली नाही. तरीही जवळपास सहाशे धरणग्रस्तांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याची नोटीस शसनाकडून बजावण्यात आली आहे. विस्थापित होऊन ३० वर्षे झाली तरी त्यांची ‘झाडाझडती’ कायम राहिली आहे. वाटप झालेली जमीन ‘अतिरिक्त’ दाखवून ती परत घेण्याचा हा घाट घातला जात असल्याने जिल्ह्यातील धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून हे धरणग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.काळम्मावाडी धरणामुळे विस्थापित झालेले हे धरणग्रस्त शासनाच्या जमीन वाटपाच्या धोरणाशी गेली २५ वर्षे लढत आहेत. जमिनीचे वाटप करणारी यंत्रणा शासनाचीच असताना आता अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचा शोध लावणारी यंत्रणा तीच आहे. पुनर्वसन अधिनियमाप्रमाणे सात एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागते. ज्यांना सात एकरांपेक्षा जास्त जमीन दिली असेल ती कमी करण्यासाठी धरणग्रस्तांची कोणतीच हरकत नाही. मात्र, यापूर्वीही अशा पद्धतीने आलेल्या नोटिसीनंतर धरणग्रस्तांनी सबळ पुरावे सादर करूनही अजून जमिनीचे वाटप परिपूर्णपणे झालेले नाही हे दाखवून दिले आहे. धरणग्रस्तांची जमिनीची मागणी अपूर्ण असताना प्रशासनाकडून हा नवा अतिरिक्त जमिनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. लाभक्षेत्रामधील ज्या जमिनी देण्यात आल्या त्या जमिनीच्या सातबारालाही अजूनही इतर हक्क अशाच नोंदी कायम ठेवून अधिकार रोखून धरण्याचा प्रकारही महसूल यंत्रणेकडून झालेला आहे. धरणग्रस्तांची ही पर्यायी जमिनीची ‘झाडाझडती’ कायम आहे. म्हणून हे आंदोलन छेडण्यात येत आहे. या मुख्य प्रश्नाबरोबरच धरणग्रस्तांच्या इतर काही मागण्या यामध्ये आहेत. धरणग्रस्तांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचा कांगावा करून नव्याने द्यावा लागणाऱ्या जमिनीबद्दलचा आवाज दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. अनेक धरणग्रस्तांच्या नावे जमिनी आहेत; पण प्रत्यक्षात ती कसण्यास मिळालेली नाही. गेल्या ३० वर्षांत धरणग्रस्तांची कुटुंबे मोठी झाली आहेत. शासनाचा हा जमिनी परत घेण्याचा कुटील डाव धरणामुळे देशोधडीला लागलेल्या ‘विस्थापितांना’ कायमचे विस्थापित करणारा आहे. त्यासाठी आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही.- बाबूराव पाटील (कागल), अध्यक्ष : काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना.