शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दूधगंगा धरणग्रस्तांची ‘झाडाझडती’

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

धरणग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा : शासनाकडून अतिरिक्त जमिनी वाटप झाल्याच्या नोटिसा

जहाँगीर शेख-कागल -दूधगंगा प्रकल्पासाठी विस्थापित होऊन ३० वर्षांचा काळ लोटल्यानंतर या धरणग्रस्त विस्थापितांना शासनाकडून पूर्णपणे पर्यायी जमीन उपलब्ध करून देता आलेली नाही. तरीही जवळपास सहाशे धरणग्रस्तांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याची नोटीस शसनाकडून बजावण्यात आली आहे. विस्थापित होऊन ३० वर्षे झाली तरी त्यांची ‘झाडाझडती’ कायम राहिली आहे. वाटप झालेली जमीन ‘अतिरिक्त’ दाखवून ती परत घेण्याचा हा घाट घातला जात असल्याने जिल्ह्यातील धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून हे धरणग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.काळम्मावाडी धरणामुळे विस्थापित झालेले हे धरणग्रस्त शासनाच्या जमीन वाटपाच्या धोरणाशी गेली २५ वर्षे लढत आहेत. जमिनीचे वाटप करणारी यंत्रणा शासनाचीच असताना आता अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचा शोध लावणारी यंत्रणा तीच आहे. पुनर्वसन अधिनियमाप्रमाणे सात एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागते. ज्यांना सात एकरांपेक्षा जास्त जमीन दिली असेल ती कमी करण्यासाठी धरणग्रस्तांची कोणतीच हरकत नाही. मात्र, यापूर्वीही अशा पद्धतीने आलेल्या नोटिसीनंतर धरणग्रस्तांनी सबळ पुरावे सादर करूनही अजून जमिनीचे वाटप परिपूर्णपणे झालेले नाही हे दाखवून दिले आहे. धरणग्रस्तांची जमिनीची मागणी अपूर्ण असताना प्रशासनाकडून हा नवा अतिरिक्त जमिनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. लाभक्षेत्रामधील ज्या जमिनी देण्यात आल्या त्या जमिनीच्या सातबारालाही अजूनही इतर हक्क अशाच नोंदी कायम ठेवून अधिकार रोखून धरण्याचा प्रकारही महसूल यंत्रणेकडून झालेला आहे. धरणग्रस्तांची ही पर्यायी जमिनीची ‘झाडाझडती’ कायम आहे. म्हणून हे आंदोलन छेडण्यात येत आहे. या मुख्य प्रश्नाबरोबरच धरणग्रस्तांच्या इतर काही मागण्या यामध्ये आहेत. धरणग्रस्तांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचा कांगावा करून नव्याने द्यावा लागणाऱ्या जमिनीबद्दलचा आवाज दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. अनेक धरणग्रस्तांच्या नावे जमिनी आहेत; पण प्रत्यक्षात ती कसण्यास मिळालेली नाही. गेल्या ३० वर्षांत धरणग्रस्तांची कुटुंबे मोठी झाली आहेत. शासनाचा हा जमिनी परत घेण्याचा कुटील डाव धरणामुळे देशोधडीला लागलेल्या ‘विस्थापितांना’ कायमचे विस्थापित करणारा आहे. त्यासाठी आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही.- बाबूराव पाटील (कागल), अध्यक्ष : काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना.