शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चरण्याचे कुरण ठरविल्याने ‘धामणी’ रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:23 IST

संजय पारकर । लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : राधानगरी तालुक्यातील धामणी धरणासाठी या भागातील रहिवाशांना गेली पंचवीस वर्षे फक्त ...

संजय पारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : राधानगरी तालुक्यातील धामणी धरणासाठी या भागातील रहिवाशांना गेली पंचवीस वर्षे फक्त आश्वासनावर झुलवत ठेवले जात आहे. पाण्यासाठी या लोकांना लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घ्यावा लागला हे सरकारचे मोठे अपयश आहे. धरणाच्या कामावर यापूर्वी सुमारे ३00 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे पैसे प्रत्यक्ष कामावर खर्च झाले असते तर कधीच येथे पाणी अडवले असते. मात्र, राजकीय नेते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा प्रकल्पांकडे केवळ ‘चरण्याचे कुरण’ म्हणून पाहिल्याने अजूनही या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.२ एप्रिल १८९४ ला राज्यकारभार हाती घेतलेले शाहू महराज त्या काळात वारंवार पडणाºया दुष्काळामुळे व्यथित होत असत. १९०२ साली त्यांनी केलेल्या युरोपच्या दौºयात तेथील धरणांची पाहणी केली. त्यामुळे आपल्या संस्थानातही अशी धरणे बांधण्याची योजना आखली. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी संस्थानात स्वतंत्र पाटबंधारे विभाग निर्माण केला. त्यात आवश्यक मनुष्यबळ देऊन यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले. यावेळी भोगावती नदीवर फेजिवडे येथे व दुधगंगा नदीवर फराळे येथे धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी अडवायचे व गरजेच्या वेळी ते नदीत सोडून ते पिण्याला व शेतीसाठी वापरायचे असे ठरविण्यात आले.९ लाख १० हजार लोकसंख्या व वार्षिक ४८.९७ लाख महसूल असलेल्या संस्थानात १४ नोव्हेंबर १९०९ ला भोगावती नदीवरील या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. यासाठी मुंबई, कर्नाटक प्रांतांतून तज्ज्ञ लोक बोलावून घेतले. १९१८ पर्यंत ४० फूट उंचीचे धरण पूर्ण झाले तेव्हा त्यात ६०० दशलक्ष फूट पाणीसाठा होत असे. या कामात त्या काळात प्रचंड अडचणी होत्या. आर्थिक टंचाई असताना त्याकाळी यासाठी १४ लाख रुपये खर्च झाले. प्रसंगी महाराजांनी आपली स्वत:ची जमीन विकून पैसा उपलब्ध करण्याची तयारी केली होती. लोकांनी न मागताच स्वत:हून महाराजांनी हे सर्व काम केले होते.आजच्या लोकशाही राज्यात मात्र लोकांना याच तालुक्यातील धामणी येथे धरण होण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत आहे. या प्रकल्पाची ९ फेब्रुवारी २००५ ला सुधारित ३२० कोटी ७० लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. त्यापासून पुढे काही वर्षांत या कामावर २९३ कोटी ६४ लाख खर्च झाले आहेत. मात्र, पाणी साठेल असे काम झालेले नाही.नुकतीच याच्या तिसºया सुधारित ७८२ कोटी खर्चाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. २३८ कोटी ७६ लाखांची फेरनिविदा निघाली आहे. मात्र, ती न्यायालयीन वादात अडकली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक ते मंत्रालयातील मोठे अधिकारी यांच्यापर्यंत कोणीच गांभीर्याने काम न केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या, तर काही निर्माण केल्या. यामुळे हा प्रकल्प रखडला. याकडे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील ३५ हजार मतदारांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय यंत्रणेने सुरुवातीला याची दखल घेतली नाही.शेवटच्या टप्प्यात हालचाली करून ग्रामस्थांना यापासून परावृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत झालेली फसवणूक लक्षात घेऊन ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पंचवीस वर्षे आधी शिवसेना-भाजप, नंतर तीन वेळा कॉँग्रेस आघाडी व पाच वर्षांपासून पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. मात्र, हा प्रश्न काही सुटलेला नाही. या खोºयात हरितक्रांती होण्यासाठी व परिसर सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी या धरणाचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.२१00 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल२४ डिसेंबर १९९६ ला मंजुरी मिळालेल्या या धरणाची मूळ किंमत १२० कोटी ३० लाखइतकी होती. प्रत्यक्षात २००० साली कामाला सुरुवात झाली. मात्र विविध अडचणींमुळे हे काम रेंगाळत गेले. परिणामी प्रकल्पाची किंमत वाढतच गेली. यातही ती किती वाढविली हा संशोधनाचा विषय आहे. ३.८४ टीएमसी क्षमतेचे हे धरण पूर्ण झाल्यावर राधानगरी ५८८, पन्हाळा ७६५ व गगनबावडा ७४७ असे २१०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यातून मोठी हरित व औद्योगिक क्रांती होऊन सामाजिक बदल प्रचंड प्रमाणात होईल.