शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘धामणी’ची एकजूट; मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:10 IST

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पाणीदार गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांनी बहिष्कारास शंभर टक्के पाठिंबा दिला. ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवीत कामात व्यस्त राहणेच पसंत केले. एकाच प्रश्नासाठी सामुदायिकपणे मतदानावर बहिष्कार घालण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या गावातील ११ हजार मतदान होऊ शकले नाही.स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील हे आमदार असल्यापासून धामणी प्रकल्पाचे काम रखडत आले आहे. शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली असताना शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते प्रकल्प पूर्णत्वाचे आश्वासन द्यायचे, लोकांनी विश्वास ठेवून मतदान करायचे व पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशीच परिस्थिती राहिल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीच ४० गावे व वाड्यावस्त्यांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करूनही फारसा फरक पडला नाही. कृती समितीतील काहींनी बहिष्कार मागे घेतला; पण बहुतांश गावांत तो कायम राहिला. लढ्यास धामणी खोºयातील सर्व गावांनी पाठिंबा दिला. मात्र मतदानाच्या अगोदर काही तास कळे धरणातून बॅकवॉटरने पाणीपुरवठा होणाºया आकुर्डे, पणुत्रे, कोदवडे या गावांनी बहिष्कारास पाठिंबा देऊन मतदानात सहभागाचा निर्णय घेतला.धामणी धरणाच्या पायथ्याशी असणाºया चौके, मानबेट, राही, कंदलगाव व याअंतर्गत येणाºया वाड्यांनी या लढ्यापासून अलिप्त राहून मतदान केले. म्हासुर्ली, बाजारीवाडी, सावंतवाडी, गवशी, कोनोली; तर पन्हाळ्यातील बळीपवाडी, पणोरे, वेतवडे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी ु गगनबावड्यातील धुंदवडे, खेरिवडे, केळोशी, जरगी, गारिवडे, आदी गावांत मतदानावर बहिष्कार टाकला.कर्मचारी बसून वैतागलेकर्मचारी सोमवारी (दि. २२) मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर हजर झाले होते. मंगळवारी लवकर उठून सहा वाजता केंद्रावर सज्ज झाले; पण दिवसभर त्यांना मतदारांची प्रतीक्षाच करावी लागली. तब्बल अकरा तास कसे घालवयाचे, असा प्रश्न त्यांना होता. काहीजणांनी एकत्रित गप्पाटप्पा रंगविल्या, तर काहींनी मतदारांची वाट बघत बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.फटका कोणाला?धामणी खोºयाचे कार्यक्षेत्र हे राधानगरी-भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे या बहिष्काराचा फटका कोणाला बसणार? कोणाच्या तरी जय-पराजयात हा बहिष्कार कारणीभूत ठरू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे.