शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

लालफितीमुळे धामणी खोरा तहानलेलाच

By admin | Updated: March 6, 2017 00:19 IST

मध्यम प्रकल्प अपूर्ण : २0 वर्षांत खर्च १२० कोटींवरून ८०० कोटींवर; पुन्हा जनआंदोलनाची तयारी

महेश आठल्ये ल्ल म्हासुर्लीराधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्याच्या हरितक्रांतीस योगदान ठरणाऱ्या राही (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम प्रशासकीय मंजुरीनंतर तब्बल वीस वर्षे, तर प्रत्यक्ष काम सुरू होऊन गेली सोळा वर्षे विविध कारणांनी अर्धवट अवस्थेत रखडले आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दोनवेळा मोर्चे काढले व सरकारने दोनवेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न आणि फेरनिविदेत प्रकल्पाचे काम याहीवर्षी सुरू न झाल्याने खोऱ्यातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रकल्पाच्या कामाबद्दल दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. सन १९९६ मध्ये धामणी नदीवर राही येथे ३.८५ टीएमीसी क्षमतेच्या व १२० कोटी खर्चाच्या धामणी मध्यम प्रकल्पास मंजुरी मिळाली. मात्र, सन २००० मध्ये गुराढोरांसह मोर्चा काढल्यावरच प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. पुनर्वसनाचा प्रश्न, निधीची कमतरता, वनविभागाचा अडथळा आदींमुळे प्रकल्पाचे अनेक वेळा काम बंद पडले. सध्या ५० टक्क्यापेक्षा अधिक काम झाले असून पुनर्वसनाचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटला आहे. मध्यंतरीच्या सिंचन घोटाळ्यात या प्रकल्पावर ताशेरे ओढले होते. मात्र, आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर आला. गतवर्षी धामणी खोरा विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. संबंधित विभागाचे मंत्री विजय शिवतारे यांनी म्हासुर्ली येथे प्रकल्प पूर्णत्वाबद्दल आश्वासन दिले होते. मंत्रालयात कृती समिती, दोन्ही आमदार, संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यावर्षी दिवाळीनंतर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न व नुकसानभरपाईची रक्कमही वाटप करण्यात आली. ७८२ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्प पूर्णत्वाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दिवाळीनंतर प्रकल्पाचे काम सुरू होण्यासंदर्भात काहीही हालचाली झालेल्या नाहीत. काही घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न व फेरनिविदा या दोन कारणांमुळे प्रकल्पाचे काम थांबले असल्याची चर्चा आहे. प्रकल्पाचा खर्च १२० कोटींवरून ८०० कोटींवर पोहोचला आहे. सध्या धामणी खोऱ्यात पाणीटंचाई जाणवत असून येत्या महिन्याभरात पिके वाळून जाणार आहेत. प्रकल्पाचे काम रखडल्याने या खोऱ्यात मुबलक शेती असूनही येथील बळिराजास मात्र झाडेतोड, सेंट्रिंग, गुऱ्हाळघर कामावर जावे लागत असून खोरे विकासापासून कोसो दूर आहे. सध्या कृती समितीने बैठक घेऊन पुन्हा आंदोलन करण्याविषयी गावागावांत पूर्वतयारी सुरू केली आहे.