शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:07 IST

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकातून केली. पंधरवड्यापूर्वी मौन व अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा आपण दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावल्याचे दिसते, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेहसन मुश्रीफ यांची खोचक टीका : मौन, अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा सल्ला धुडकावल्याचे दिसते

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकातून केली. पंधरवड्यापूर्वी मौन व अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा आपण दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावल्याचे दिसते, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.काही दिवसांपूर्वी आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना मौनम् सर्वार्थ साधनम्, मौन व्रतामुळे शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांनी ती पुस्तके काही वाचलेली दिसत नसल्यानेच निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या १०० कोटींच्या मदतीवर फडणवीस यांनी, राज्य सरकारची अवस्था पॉलिसी पॅरालिसिस नाही तर ॲक्शन पॅरालिसिससुद्धा आहे, अशी टीका केली.वास्तविक पंचनामे झाल्याशिवाय अशी मदत देता येत नसते; परंतु विजेचे ट्रान्स्फॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तत्काळ मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपये तातडीने जाहीर केले. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील संकट नियंत्रणात आणले आहे. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांतील कामाबद्दल प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचणीत देशातील पाच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांत उद्धव ठाकरे यांची गणना झाली, हेच देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याचे दिसते. ज्या ज्यावेळी कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होतात किंवा मृत्यूचा आकडाही कमी असतो, त्यावेळी फडणवीस आकडे खोटे असल्याचे सांगण्यासाठी उसळून उठतात.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, चीन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार असल्याचे जाहीर केले. या लसीमुळे कोरोना संपुष्टात आला तरी देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण सुचवलेली पुस्तके त्यांनी वाचली; तर वैफल्यग्रस्त मन:स्थितीतून ते बाहेर येतील आणि मनस्वास्थ्य ठीक होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर