शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 15:59 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.

ठळक मुद्देकोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावामहाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.यात्रेच्यानिमित्ताने फडणवीस यांचे सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले होते.ढोल, ताशांचा गजर, महाजनादेश यात्रेचे विशेष गीत, सर्वत्र फडकणारे भाजपचे ध्वज आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेलमधून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बसवर आले. तेथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे होते.फडणवीस म्हणाले,चंद्रकांत पाटील आणि अमल महाडिक यांनी अनेक विकासकामे मंजूर करून आणली. कोल्हापुर आम्ही टोलमुक्त केले. अंबाबाईचा आराखडा मंजूर करून निधी दिला. एअर पोर्टवर भारतात कुठेही जाण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर यापुढच्या काळात कोल्हापूरला पुराशी सामना करावाच लागू नये अशी उपाययोजना केली जाणार आहे.तत्पूर्वी स्टेशन रोडवरून अभिवादन करत निघालेली ही यात्रा दसरा चौकामध्ये आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी घेऊन यात्रेत सहभागी झाले. दसरा चौकामध्ये तसेच बिंदू चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. कॉमर्स कॉलेजसमोर रजनी मगदूम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून उमा टॉकीजमार्गे गोखले कॉलेजच्या चौकामध्येही त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.हॉकी स्टेडियम परिसरातून जाताना माजी स्थायी सभापती विजय साळोखे आणि त्यांच्या हॉकी खेळाडूंनी हॉकी स्टीक उंचावत तर निर्माण चौकामध्ये महापालिकेतील भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. संभाजीनगर चौकातील स्वागत स्वीकारून फडणवीस यांनी नागरिकांना अभिवादन करत थेट कळंबा गाठले. या ठिकाणी भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्रानी,सत्यजित कदम, अजित ठाणेकर, प्रताप कोंडेकर, शिवाजीराव बुवा, भारती जोशी,हेमंत आराध्ये, अ‍ॅड. संपतराव पवार, रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कचरे यांच्यासह भाजप, ताराराणीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर