शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

विकास आराखड्यास आता ग्रामसभेची मंजुरी आवश्यक

By admin | Updated: July 27, 2016 00:29 IST

आमचा गाव, आमचा विकास योजना : घाईगडबडीत, मनमानी पद्धतीने होणाऱ्या कामांवर लगाम

कळंबा : खेड्यात ग्रामपंचायतींमार्फत विविध स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार विकासकामे केली जातात. अनेकवेळी नागरिकांच्या स्थानिक गरजा दुर्लक्षित होतात. गावात कोणते विकासकाम सुरू आहे, याचा ग्रामपंचायतीखेरीज कोणास मागमूसच नसतो; परंतु आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत गावांच्या विकासासाठी गावपातळीवर नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आता गावाचा विकास आराखडा तयार करून त्यास १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या कालावधीकरिता हा विकास आराखडा आता २०१५ ते २०२० साठी मर्यादित आहे. हा विकास आराखडा तयार करताना यामध्ये ग्रामपंचायतींना विविध करांच्या रूपाने मिळणारा निधी, स्वच्छ भारत अभियान व बक्षिसांच्या स्वरूपात मिळणारा निधी, १४ व्या वित्त आयोगाच्या राज्य शासनाकडून मिळणारा महसुलातील हिस्सा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, लोकसहभागातून मिळणारे उत्पन्न व निधींचा एकत्रित विचार करून संबंधित विकास आराखडा तयार करायचा आहे. पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत त्याची अंतिम मंजुरी घेत तो जिल्हा परिषदेकडे पाठविणे बंधनकारक आहे.ग्रामपंचायत सदस्यांना विकासकामांबाबत घाईगडबडीत निर्णय घेता येणार नाही. विकास आराखडा तयार करून त्यातील कामे करताना मानव विकास निर्देशांक ग्रामसूचित दिलेल्या कामांमधून स्थानिक आवश्यकतेनुसारची कामेही अग्रक्रमाने करावयाची आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतींनी आता आपापल्या गावांत कोणकोणत्या सुविधा असाव्यात, याचा निर्णय घ्यायचा आहे; परंतु हा निर्णय फक्त ग्रामपंचायत सदस्यांना आपल्या मर्जीने घेता येणार नाही. आता गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ग्रामसभेपुढे ठेवूनच, ग्रामसभांच्या माध्यमातून घेणे बंधनकारकच राहणार आहे. असा हा विकास आराखडा लोकसहभागीय पद्धतीने राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसंसाधन गट स्थापन करण्यात येणार असून, संबंधित गटांची संख्या ही ग्रामपंचायतींच्या सदस्य संख्येच्या तीनपट असणार आहे. विकास आराखडा करण्यासाठी पंचायत समिती गणांसाठी प्रभारी अधिकारी मास्टर ट्रेनरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून होणार आहे.गावच्या विकास आराखड्यात जनतेचा सहभाग असल्याने स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार विकास आराखड्यास ग्रामसभांची मंजुरी आवश्यक असल्याने सदस्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. तसेच गावचा नियोजित पद्धतीने विकास होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ( वार्ताहर)