शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पर्यटनवाढीसाठी पंचगंगा घाटाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी पंचगंगा नदीघाट विकसित करणे आवश्यक असून, सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल; त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट ...

ठळक मुद्देचंद्रकात पाटील : पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन; २६ कोटींचा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी पंचगंगा नदीघाट विकसित करणे आवश्यक असून, सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल; त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट विकसित करण्याच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणे विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटन वाढले तरच आपोआपच रोजगारही उपलब्ध होतील. हाच उद्देश ठेवून पंचगंगा घाट विकसित करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान करण्यात येत असून दोन वर्षांतच पंचगंगा घाट परिसर शहरवासीयांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल. सकाळी नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांना चेंजिंग रूम्स आणि स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मोठे उद्योगधंदे येण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे किमान चार ते पाच हजार लोकांना कामधंदा मिळेल, असा आशावाद त्यांनी केला.पंचगंगा नदीचे प्रदूषण हा मोठा प्रश्न बनल्याने तो सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.शाहू छत्रपती यांनीही, घाट सुशोभीकरणासह शुद्धीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नियोजन अधिकारी सरिता यादव, स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, किरण नकाते, रूपाराणी निकम, माधवी गवंडी, सरिता मोरे, आदी उपस्थित होते.पर्यटनवाढीसाठी दोन महिने सहलीचेजिल्ह्यात १५ एप्रिलपासून दोन महिने पर्यटन सहलींचे आयोजन केले असून, आठवड्यातून किमान दोन दिवस सहलींचे आयोजन केले आहे. सहभागी पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहनाची सोय केली जाईल. पर्यटकांना जिल्ह्यातील दुर्लक्षित आठ स्थळे दाखविण्यात येणार आहेत. राधानगरीत सुमारे आठ हजार फुलपाखरांची बाग विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.पुरातन मंदिरेही विकसितपंचगंगा नदीपात्रात व परिसरात अनेक पुरातन मंदिरे, दीपमाळा असल्याने त्यांचीही डागडुजी करून त्याही सुशोभित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशीही घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.गावांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेतमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेचे शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पंचगंगा आणि रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत; तसेच पाळीव जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. नदीकाठच्या गावांनीही प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी गावातच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारावेत. त्यासाठी निधी देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.