शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': तिरुपतीच्या धर्तीवर विकास म्हणजे विस्थापनाची भीती

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 19, 2025 16:47 IST

जोतिबा ग्रामस्थांमध्ये संभ्रम : आम्हाला विश्वासात का घेत नाही हाच प्रश्न

इंदुमती गणेशकोल्हापूर : आमचा जोतिबा विकास प्राधिकरणाला विरोध नाही; पण विकास म्हणजे नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. तिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे डोंगरावरील गाव पायथ्याशी वसवणार का?, आम्हाला पर्यायी जागा देणार की घरे देणार? की नुकसानभरपाईची रक्कम देणार? आजवर जेवढे विकास प्रकल्प झाले. पाटबंधारे प्रकल्प झाले त्यापैकी एकाही प्रकल्पातील बाधितांना न्याय मिळालेला नाही मग आमचेही असेच होणार का? असे अनेक प्रश्न जोतिबा ग्रामस्थांमध्ये आहेत.पन्हाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुढील पंधरा दिवसांत प्राधिकरणाची स्थापना करू हे जाहीर केल्यापासून जोतिबा डोंगरावरील रहिवाशांमध्ये गोंधळल्याचे वातावरण आहे. आमदार विनय कोरे यांनी या कार्यक्रमात एकाही माणसाचे विस्थापन न करता जोतिबा मंदिराचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोतिबा विकास आराखडा बनवला जात आहे, तो दोनवेळा शासनाला पाठवला गेला, त्रुटी दूर करण्यात आल्या; पण हे सगळं जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व खाते, वास्तुविशारद अशा मोजक्या लोकांमध्येच फिरत आहे. वास्तवात तिथे राहणाऱ्या नागरिकांना तेथील भौगोलिक परिस्थितीची अधिक चांगली माहिती असताना आराखडा बनवताना त्यांना अजिबातच विश्वासात घेतले गेलेले नाही ही त्यांची मूळ तक्रार आहे. आम्ही सगळं वृत्तपत्रांतूनच वाचत आहोत. प्रत्यक्षात ग्रामपंचायत, देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव व ग्रामस्थ आराखड्याबाबत अंधारात आहेत.सुंदर जोतिबा प्रकल्पातील कामे अपुरी राहिल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. असेच प्राधिकरणच्या बाबतीत झाले तर काय, याची चिंता आहे. विकास जरूर करा; पण आमच्या गरजा, प्रश्न आणि भौगोलिक स्थिती लक्षात घ्या एवढेच जोतिबा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

समाधान करायला हवेतिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे ग्रामस्थांना डोंगरावरून खालच्या गावांमध्ये विस्थापित व्हावे लागेल, याची भीती आहे. बरं स्थलांतर व्हायला पण काही हरकत नाही; पण याआधी झालेल्या सगळ्या प्रकल्पांचा बाधितांना वाईट अनुभव आहे. आमचेही तसेच झाले तर रस्त्यावर यावे लागेल, अशी शंका आहे. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हवी आहेत.

धार्मिक विधी कसे करणार?जोतिबावर ८० टक्के ग्रामस्थ हे देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव आहेत. विस्थापित व्हावे लागले तरी त्यांची २ ते ३ किलोमीटर, डोंगराच्या पायथ्यालाच किंवा मंदिराच्या आवारातच काही खोल्या बांधून आठवडा असणाऱ्या गुरवांसाठी सुविधा निर्माण कराव्या लागतील. अन्यथा देवाच्या धार्मिक विधीत अडचणी येऊ शकतात.

जोतिबा डोंगराचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे; पण प्रशासनाने आराखडा करताना ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. अजूनही आम्हाला आराखड्यात नेमके काय आहे माहिती नाही. येथे स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा अभाव हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक व्हावी. ग्रामस्थांचा उदरनिर्वाह डोंगरावर अवलंबून आहे, त्याचा आराखड्यात विचार व्हावा. - राधा बुणे, माजी सरपंच

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा