शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:20 IST

कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे.

ठळक मुद्दे संभाजीराजे; जैसलमेर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांना आवाहनअनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. त्याअर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळांची उत्तम देखभाल करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी केले.जैसलमेर (राजस्थान) येथे इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराज गजसिंह होते.संभाजीराजे म्हणाले, पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखो कुटुंबांना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होऊ शकतात.

आपण आपला वारसा जतन करा, तो पर्यटकांना दाखवा आणि त्यायोग्य स्वत:चा विकास घडवून घ्या.ते पुढे म्हणाले, सर्व राज्यांनी पुढाकार घेऊन धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत. वारसा स्थळांचा भूतकाळ ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशभरात लाखो पर्यटकांना ही स्थळे आकर्षित करतात. या वारसा वास्तू आपल्याला भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतील.अंतिम उद्देश सामाजिक सुधारणा हाच पाहिजेमराठ्यांना लष्करी यश मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सुधारणांच्या कार्यात झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास हेच दर्शवितो. आपल्या सर्वांचा अंतिम उद्देश, आर्थिकहित व सामाजिक सुधारणांचा असला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.