शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:20 IST

कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे.

ठळक मुद्दे संभाजीराजे; जैसलमेर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांना आवाहनअनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. त्याअर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळांची उत्तम देखभाल करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी केले.जैसलमेर (राजस्थान) येथे इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराज गजसिंह होते.संभाजीराजे म्हणाले, पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखो कुटुंबांना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होऊ शकतात.

आपण आपला वारसा जतन करा, तो पर्यटकांना दाखवा आणि त्यायोग्य स्वत:चा विकास घडवून घ्या.ते पुढे म्हणाले, सर्व राज्यांनी पुढाकार घेऊन धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत. वारसा स्थळांचा भूतकाळ ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशभरात लाखो पर्यटकांना ही स्थळे आकर्षित करतात. या वारसा वास्तू आपल्याला भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतील.अंतिम उद्देश सामाजिक सुधारणा हाच पाहिजेमराठ्यांना लष्करी यश मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सुधारणांच्या कार्यात झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास हेच दर्शवितो. आपल्या सर्वांचा अंतिम उद्देश, आर्थिकहित व सामाजिक सुधारणांचा असला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.