शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:20 IST

कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे.

ठळक मुद्दे संभाजीराजे; जैसलमेर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांना आवाहनअनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. त्याअर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळांची उत्तम देखभाल करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी केले.जैसलमेर (राजस्थान) येथे इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराज गजसिंह होते.संभाजीराजे म्हणाले, पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखो कुटुंबांना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होऊ शकतात.

आपण आपला वारसा जतन करा, तो पर्यटकांना दाखवा आणि त्यायोग्य स्वत:चा विकास घडवून घ्या.ते पुढे म्हणाले, सर्व राज्यांनी पुढाकार घेऊन धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत. वारसा स्थळांचा भूतकाळ ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशभरात लाखो पर्यटकांना ही स्थळे आकर्षित करतात. या वारसा वास्तू आपल्याला भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतील.अंतिम उद्देश सामाजिक सुधारणा हाच पाहिजेमराठ्यांना लष्करी यश मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सुधारणांच्या कार्यात झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास हेच दर्शवितो. आपल्या सर्वांचा अंतिम उद्देश, आर्थिकहित व सामाजिक सुधारणांचा असला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.