शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ग्रामीण कारागिरांसाठी ‘महाखादी ब्रॅँड’ विकसित करू : एम. निलिमा केरकट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:33 IST

कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महा खादी ब्रॅन्ड’ विकसित ...

ठळक मुद्देग्रामीण कारागिरांसाठी ‘महाखादी ब्रॅँड’ विकसित करू : एम. निलिमा केरकट्टा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महाखादी ब्रॅन्ड’ विकसित केला जाईल. त्या माध्यमातून कारागीरांच्या उत्पादनाच्या खरेदी आणि विक्रीची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांनी सोमवारी दिली.महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रीबाळकृष्ण हवेली मंदिर येथे पाच दिवसांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत्या.

प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, आदींची होती.

यावेळी डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. केरकट्टा म्हणाल्या, महाखादी ब्रॅन्डच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कारागीरांच्या उत्पादनांची घरोघर जाऊन खरेदी करून त्यांची देशाच्या बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जात आहे. या यंत्रणेद्वारे कारागीरांच्या उत्पादनाच्या केलेल्या खरेदीची रक्कम ४५ दिवसांत दिली जाणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रामीण कारागिरांनी आपल्या उत्पादनाची नोंदणी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकाऱ्याकडे करावी. महाखादी ब्रॅन्डबरोबरच ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना मुख्यमंत्र्यांच्या महालाभार्थी पोर्टलशी जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना जगाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महामंडळाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संकेतस्थळ विकसित करून त्यावर उद्योजकांची नोंदणी करून घ्यावी. याकामी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मोहन कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार डांगर यांनी आभार मानले.

प्रदर्शनात ३५ स्टॉल्सहे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये शुद्ध व सेंद्रिय मध, सेंद्रिय हळद, मसाले, आयुर्वेदिक औषधे, खानदेशी पापड, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, तसेच शोभीवंत वस्तू, मधमाशा पालनासाठीचे साहित्य, खादी कापड, साबण, बेदाणे, फर्निचर, कपडे, कोल्हापुरी चप्पल, गांडूळ खत, सुगंधी उदबत्ती, फरसाण, गुळ काकवी, घोंगडी असे ३५ स्टॉल्स आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवशी गर्दी होती.

 

 

टॅग्स :Khadiखादीkolhapurकोल्हापूर