शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रथम शहराचा विकास करा

By admin | Updated: March 24, 2015 00:11 IST

हद्दवाढविरोधी कृती समिती : हद्दवाढ नाकारल्याने मानले शासनाचे आभार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची हद्द वाढविल्यास १७ गावांतील शेती व समाजजीवनच धोक्यात येणार आहे. प्रथम शहराचा विकास करा, तेथे पायाभूत सुविधा पुरवा, मग हद्दवाढीचा विचार करा, असे मत माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याबद्दल हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय समितीतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले.हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १७ गावांतील शेती व दुग्ध उत्पादन, आदींसह अर्थव्यवस्थेलाच धक्का लागणार असल्याचे लक्षात आल्यानेच शासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याचे मत शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राजू ऊर्फ सुनील माने, बी. ए. पाटील, नाथाजी पोवार, सुरेश सूर्यवंशी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या महानगरपालिका शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे १७ गावांतील नागरिकांना त्या सुविधा देऊ शकणार नाही, असा दावा कृती समितीने केला. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाले. महालक्ष्मी कृती आराखड्याच्या माध्यमातून विकास निधी आणता येईल, यासाठी कृती समिती लढा देण्यास तयार आहे. हद्दवाढीबाबत १७ गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेण्याच्या प्रयत्नाविरोधात शासनाने कौल दिला आहे. हद्दवाढ व शहराचा विकास याचा दुरान्वये संबंध नाही. हद्दवाढ झाल्यानंतर शहराचा कसा विकास होणार, हे एकदा पटवून द्यावे, असे आवाहन संपतराव पवार-पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)महापालिकेतील भ्रष्टाचाराचे दररोज एक प्रकरण दैनिकांतून प्रसिद्ध होत आहे. महासभेत शहर विकासाच्या एकाही मुद्द्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे मोक्याच्या जागा लाटण्यासाठीच हद्दवाढ पाहिजे आहे का? अशी शंका येण्यासारखेच वातावरण आहे.- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना