शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रथम शहराचा विकास करा

By admin | Updated: March 24, 2015 00:11 IST

हद्दवाढविरोधी कृती समिती : हद्दवाढ नाकारल्याने मानले शासनाचे आभार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची हद्द वाढविल्यास १७ गावांतील शेती व समाजजीवनच धोक्यात येणार आहे. प्रथम शहराचा विकास करा, तेथे पायाभूत सुविधा पुरवा, मग हद्दवाढीचा विचार करा, असे मत माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याबद्दल हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय समितीतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले.हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १७ गावांतील शेती व दुग्ध उत्पादन, आदींसह अर्थव्यवस्थेलाच धक्का लागणार असल्याचे लक्षात आल्यानेच शासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याचे मत शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राजू ऊर्फ सुनील माने, बी. ए. पाटील, नाथाजी पोवार, सुरेश सूर्यवंशी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या महानगरपालिका शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे १७ गावांतील नागरिकांना त्या सुविधा देऊ शकणार नाही, असा दावा कृती समितीने केला. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाले. महालक्ष्मी कृती आराखड्याच्या माध्यमातून विकास निधी आणता येईल, यासाठी कृती समिती लढा देण्यास तयार आहे. हद्दवाढीबाबत १७ गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेण्याच्या प्रयत्नाविरोधात शासनाने कौल दिला आहे. हद्दवाढ व शहराचा विकास याचा दुरान्वये संबंध नाही. हद्दवाढ झाल्यानंतर शहराचा कसा विकास होणार, हे एकदा पटवून द्यावे, असे आवाहन संपतराव पवार-पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)महापालिकेतील भ्रष्टाचाराचे दररोज एक प्रकरण दैनिकांतून प्रसिद्ध होत आहे. महासभेत शहर विकासाच्या एकाही मुद्द्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे मोक्याच्या जागा लाटण्यासाठीच हद्दवाढ पाहिजे आहे का? अशी शंका येण्यासारखेच वातावरण आहे.- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना