शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

देवाळे, गाडेगोंडवाडीत ऊसतोडी रोखल्या

By admin | Updated: November 2, 2016 00:59 IST

स्वाभिमानीचे आंदोलन : हळदी गट कार्यालयाला कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे

सडोली (खालसा) : तिढा न सुटताच डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊस तोडण्या सुरूकेल्या होत्या. या ऊस तोडण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडून हळदी (ता. करवीर) येथील कारखान्याच्या गट आॅफिसला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना, ऊस तोडप्यांना हाकलून लावले. ‘एफआरपी’चा तिढा न सुटल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही व शासनाने परवानगीही दिली नाही; तरी सुद्धा डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊसतोड सुरू केली होती. तोडण्या सुरू आहेत, हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील यांनी ऊस फडात जाऊन ऊस तोडप्यांना पळवून लावून ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली व हळदी (ता. करवीर) येथील डी. वाय. पाटील कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे लावून कर्मचाऱ्यांना हाकलून लावले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेती आॅफिसला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. यावेळी जनार्दन पाटील म्हणाले, शासनाने ऊस गाळपाची परवानगी न देता जे कारखाने सुरू केले आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा शेतकरी संघटना आपली ताकद दाखवून देईल. यावेळी प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, तानाजी मगदूम, विलास पाटील, नामदेव कारंडे, आण्णाप्पा चौगले, बाबूराव पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, रणजित पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.