शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

देवाळे, गाडेगोंडवाडीत ऊसतोडी रोखल्या

By admin | Updated: November 2, 2016 00:59 IST

स्वाभिमानीचे आंदोलन : हळदी गट कार्यालयाला कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे

सडोली (खालसा) : तिढा न सुटताच डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊस तोडण्या सुरूकेल्या होत्या. या ऊस तोडण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडून हळदी (ता. करवीर) येथील कारखान्याच्या गट आॅफिसला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना, ऊस तोडप्यांना हाकलून लावले. ‘एफआरपी’चा तिढा न सुटल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही व शासनाने परवानगीही दिली नाही; तरी सुद्धा डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊसतोड सुरू केली होती. तोडण्या सुरू आहेत, हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील यांनी ऊस फडात जाऊन ऊस तोडप्यांना पळवून लावून ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली व हळदी (ता. करवीर) येथील डी. वाय. पाटील कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे लावून कर्मचाऱ्यांना हाकलून लावले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेती आॅफिसला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. यावेळी जनार्दन पाटील म्हणाले, शासनाने ऊस गाळपाची परवानगी न देता जे कारखाने सुरू केले आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा शेतकरी संघटना आपली ताकद दाखवून देईल. यावेळी प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, तानाजी मगदूम, विलास पाटील, नामदेव कारंडे, आण्णाप्पा चौगले, बाबूराव पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, रणजित पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.