शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मंडळांचा निर्धार; यंदा डॉल्बी नाय लावणार

By admin | Updated: August 24, 2016 00:28 IST

गणेशोत्सव : डॉल्बी मुक्तीसाठी पोलिसांसह सामाजिक संघटनांचे प्रयत्न; गतवर्षी ४१८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गणेश शिंदे -- कोल्हापूर --गतवर्षी गणेशोत्सवामध्ये ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या, विशेषत: डॉल्बी लावल्याप्रकरणी शहरातील ६२ गणेश तरुण मंडळांवर कारवाई झाली. त्यामध्ये अध्यक्षांसह ४१८ जणांवर गुन्हे दाखल होऊन संबंधित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा शहरातील काही मंडळांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिला असून, डॉल्बीमुक्तीच्या दिशेने कोल्हापूरची सकारात्मक वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या वर्षी शहरातील ८९९ तालीम मंडळे, तरुण मंडळांची नोंद पोलिस प्रशासनाकडे आहे. यापैकी ६२ मंडळांवर पर्र्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ सह ध्वनिप्रदूषण नियम २००० नुसार जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये कसबा बावडा , शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी परिसरासह आर. के. नगर, सुभाषनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, गजानन महाराजनगर, आदी उपनगरांतील गणेश तरुण मंडळांचा समावेश आहे. यंदा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून, ती ९२३ झाली आहे. गेली अनेक वर्षे पोलिसांसह सामाजिक संस्था डॉल्बीमुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत; पण यामध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. यंदा पोलिस यंत्रणेने मंडळांच्या बैठका घेऊन प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी तब्बल ६२ मंडळांवर कारवाई झाल्याने यंदा काही मंडळांनी स्वत:हून डॉल्बी न लावण्याची ग्वाही पोलिसांना दिली आहे. त्यामुळे ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची वाटचाल सकारात्मक दृष्टीने सुरू आहे. कायदा काय सांगतो....पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम २४ (२) प्रमाणे जर एखाद्याची कृती / कायद्याचे पालन न करणे याद्वारे प्रस्तुत कायद्याखाली तसेच इतर कायद्यांन्वये जर गुन्हा सिद्ध होत असल्यास ती व्यक्ती पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ खालील तरतुदीप्रमाणे शिक्षेस पात्र राहील. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये दोषी इसमास पाच वर्षे कैद व एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास व सदरची कृती सुरू राहिल्यास प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ (२) अन्वये अपराध सिद्धीनंतर एक वर्षापर्यंत वरील नियमाचा भंग / उल्लंघन करण्याचे सुरू राहिल्यास त्यास सात वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कडक कारवाई होणारच गेल्या गणेशोत्सव काळात ज्यांनी डॉल्बी लावला, त्यांचे डेसिबल तपासण्यात आले आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज व सरकारी पंच यामध्ये घेण्यात आल्याने मंडळांवर कडक कारवाई होणार हे नक्की आहे. ध्वनितरंग धोकादायक वैद्यकीय तज्ज्ञांचे मतअल्ट्रोसोनिक आवाजांचे रूपांतर डिजिटलमध्ये होते. त्यात चुंबकीय ध्वनी लहरी मोठ्या प्रमाणात असतात. डेसिबल नियमित चढ-उतारात काम करते. मात्र, डॉल्बीमुळे डेसिबल सरळ रेषेत निर्माण होते. या ध्वनिलहरीमुळे हृदयविकाराचा झटका येणे, दरदरून घाम येणे, बहिरेपणा येणे, रक्तदाब वाढणे या समस्यांना सामोरे जावे लागते. - डॉ. अर्जुन आडनाईक, हृदयविकार तज्ज्ञडॉल्बीमुळे कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. पडदा नाजूक असल्याने तो प्रसंगी फाटू शकतो. त्यात शस्त्रक्रियेद्वारे सुधारणा करता येते. मात्र, कानाच्या आतील आंतर पटलास तीव्र आवाजाच्या ध्वनिलहरींमुळे इजा झाल्यास काहीच करता येत नाही. तीव्र ध्वनी तरंगांमुळे निरोगी माणूस रोगी बनू शकतो.- डॉ. चेतन घोरपडे- सहयोगी प्राध्यापक, शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयआज नांगरे-पाटील संवाद साधणारडॉल्बीमुक्तीची घेतली जाणार शपथकोल्हापूर : आगामी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी तालीम व मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांशी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील सुसंवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून डॉल्बीमुक्तीची शपथ घेतली जाणार आहे. आज, बुधवारी दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, शहर उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे अमरसिंह जाधव, निरीक्षक तानाजी सावंत, अशोक धुमाळ, अनिल देशमुख, प्रवीण चौगुले, अमृत देशमुख उपस्थित राहणार आहेत.