शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
3
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
4
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
5
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
6
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
7
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
8
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
9
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
10
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
11
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
12
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
13
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
14
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
15
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
16
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
17
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
18
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
19
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
20
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!

खोळंबा अन् प्रवाशांचे हाल

By admin | Updated: December 19, 2015 01:15 IST

एस. टी. कर्मचारी आंदोलन : पोलिसांबरोबर शाब्दिक चकमक; दुपारनंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : राज्यातील महाराष्ट्र एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स, काँग्रेस (इंटक)च्या कामगारांचे गुरुवारपासून सुरु असलेले आंदोलन शासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आले. मात्र दुपारपर्यंत जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली. सकाळी सव्वाबाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आंदोलक नरमले. ‘गांधीगिरी’ पद्धतीने चालकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. अन्य महामंडळे व राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा ‘एस.टी’मध्ये अत्यंत कमी पगार आहे. कामगार करार २०१२-१६ रद्द करून एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांतील चालक, वाहक, तांत्रिक या विभागांतील ७०० कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून पुन्हा ‘इंटक’चे राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळुंखे, विजय सणगर, रूपाली पाटील, सारिका पाटील, सुरेश गवळी, बजरंग चव्हाण, सुनंदा काळे, सारिका शिंदे, सयाजी घोरपडे, सुनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. साडेअकरा ते साडेबारा या वेळेत आंदोलकांनी काही बसेस अडविण्याचा प्रयत्न केला. त्वरित पोलिसांचा फौजफाटा आला. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून बससेवा सुरळीत केली. आंदोलक आक्रमकपणे बस रोखण्यासाठी जात होते. त्यावेळी ‘काल ताब्यात घेऊन सोडून दिले होते, आज गुन्हा दाखल करतो,’ असा दम शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी काही काळ पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत शांततेने संप सुरू ठेवला. दरम्यान, बसवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच फलाटांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बससंबंधी विचारणा करण्यासाठी चौकशी कक्षात झुंंबड उडाली होती. प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याने एस.टी. प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नाइलाजास्तव काही प्रवाशांनी खासगी वाहनांतून जाणे पसंत केले.