शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

वरिष्ठांचे दुर्लक्ष : गुन्हेगारीत वाढ, तपास अपूर्णच

एकनाथ पाटील - कोल्हापूर  शहरासह करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज आणि इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षक हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्यासारखेच आहेत. त्यांची विभागातील पोलीस ठाण्यांवर वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्तावले आहेत. जिल्ह्यात खून, खुनाच्या प्रयत्नांसह दरोडा, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पुन्हा तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशांच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आदी शहरांमध्ये गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. बलात्काराच्या आणि छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे. दुचाकीवरून भरधाव येऊन महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम स्टाईल’ने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, सावकारी, क्षणिक वादातून खुनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणींना लग्नाचे, तर अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा हे या तपासामध्ये व्यस्त असल्याने त्यांना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे लक्ष देता आलेले नाही. कोल्हापूर शहर, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, परंतु ते मनापासून ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांचा वचक नसल्याने पोलीस स्थानक स्तरावरील अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे सुस्तावल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. लँडमाफियांचे वाढते नेटवर्कशहरालगतच्या ग्रामीण भागांत प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँडमाफिया सामान्य लोकांच्या जागा गिळंकृत करीत आहेत. या माफियांच्या जोरावर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईपासून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, आदी परिसरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कोल्हापुरातील लँडमाफियांशी कनेक्शन असल्याचे समजते. सहा हत्यांचा तपास ?कणेरीवाडी येथील तलावात पोत्यात सापडलेला तरुणाचा मृतदेह त्यापाठोपाठ कात्यायनी परिसरात तरुणीचा निर्घृण खून, वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे करवीर पोलिसांना आढळून आले. वाघबीळ घाटातील झुडुपात छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह करवीर पोलिसांनाच सापडला. जोतिबा-कुशिरेच्या शेतमाळावर आठ वर्षांच्या मुलीचा खून करून मृतदेह दफन केल्याचा आढळला. तो तरुण-तरुणी त्या दोन निष्पाप बालिका कोण ? त्यांचा खून कोणी केला ? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर याचा कसबा वाळवेनजीक निर्घृण खून करण्यात आला. त्याचा शोध आजही लागलेला नाही.