शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

वरिष्ठांचे दुर्लक्ष : गुन्हेगारीत वाढ, तपास अपूर्णच

एकनाथ पाटील - कोल्हापूर  शहरासह करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज आणि इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षक हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्यासारखेच आहेत. त्यांची विभागातील पोलीस ठाण्यांवर वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्तावले आहेत. जिल्ह्यात खून, खुनाच्या प्रयत्नांसह दरोडा, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पुन्हा तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशांच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आदी शहरांमध्ये गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. बलात्काराच्या आणि छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे. दुचाकीवरून भरधाव येऊन महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम स्टाईल’ने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, सावकारी, क्षणिक वादातून खुनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणींना लग्नाचे, तर अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा हे या तपासामध्ये व्यस्त असल्याने त्यांना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे लक्ष देता आलेले नाही. कोल्हापूर शहर, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, परंतु ते मनापासून ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांचा वचक नसल्याने पोलीस स्थानक स्तरावरील अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे सुस्तावल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. लँडमाफियांचे वाढते नेटवर्कशहरालगतच्या ग्रामीण भागांत प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँडमाफिया सामान्य लोकांच्या जागा गिळंकृत करीत आहेत. या माफियांच्या जोरावर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईपासून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, आदी परिसरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कोल्हापुरातील लँडमाफियांशी कनेक्शन असल्याचे समजते. सहा हत्यांचा तपास ?कणेरीवाडी येथील तलावात पोत्यात सापडलेला तरुणाचा मृतदेह त्यापाठोपाठ कात्यायनी परिसरात तरुणीचा निर्घृण खून, वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे करवीर पोलिसांना आढळून आले. वाघबीळ घाटातील झुडुपात छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह करवीर पोलिसांनाच सापडला. जोतिबा-कुशिरेच्या शेतमाळावर आठ वर्षांच्या मुलीचा खून करून मृतदेह दफन केल्याचा आढळला. तो तरुण-तरुणी त्या दोन निष्पाप बालिका कोण ? त्यांचा खून कोणी केला ? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर याचा कसबा वाळवेनजीक निर्घृण खून करण्यात आला. त्याचा शोध आजही लागलेला नाही.