शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

दुहेरी साखर दराबाबत चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:19 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाºया साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. राष्टÑीय साखर कारखाना फेडरेशनच्या मागणीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सकारात्मक असून, त्यांनी हे दोन दर कसे असावेत व दोन ग्राहक कसे ठरविता येतील, याबाबतची माहिती फेडरेशनकडे मागितली आहे.साखर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाºया साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. राष्टÑीय साखर कारखाना फेडरेशनच्या मागणीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सकारात्मक असून, त्यांनी हे दोन दर कसे असावेत व दोन ग्राहक कसे ठरविता येतील, याबाबतची माहिती फेडरेशनकडे मागितली आहे.साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असल्याने तिच्या दरावर सरकारचे नियंत्रण असते. साखरेचे दर ठरावीक किमतीच्या वर जाऊ दिले जात नाहीत. एकीकडे ऊसदरासाठी ‘एफआरपी’चा कायदा केला; पण साखरेचे दर अस्थिर राहिल्याने साखर कारखानदार अडचणीत येतात. उसाची बिले देण्यासाठी कारखान्यांना कर्जे काढावी लागतात. त्यांचे हप्ते व एफआरपीप्रमाणे दर देताना कारखानदारांची दमछाक उडते. यातून राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या चिमण्या कायमच्या थंडावल्या. साखर कारखानदारी वाचविण्यासाठी साखरेला ‘जीवनाश्यक वस्तू कायद्या’तून काढून तिचे दोन दर ठरविण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.याबाबत ‘इस्मा’ व राष्टÑीय सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या वतीने केंद्रीय अन्न मंत्रालयाकडे मागणी केली होती. व्यक्तिगत (घरगुती) वापर व उद्योगासाठी साखरेचे दर वेगवेगळे ठरविण्यासाठी फेडरेशनने २२ डिसेंबर २०१७ रोजी केंद्राकडे मागणी केली. त्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. घरगुती व उद्योग असे ग्राहक कसे निवडावेत व दोन दर कसे असावेत, याबाबत आपल्या स्तरावरून अधिक माहिती देण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव जितेंद्र जुएल यांनी केली आहे.मिठाईमध्ये दुप्पट कमाईसाधारणत: एक किलो मिठाईसाठी ४०० ग्रॅम साखर लागते. म्हणजे १६ रुपयांच्या साखरेवर ४०० रुपये किलोने मिठाई विकली जाते. त्यामुळे मिठाईसाठी सवलतीच्या दरातील साखर का? असा शेतकरी संघटनांचा सवाल आहे.