शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

दूषित पाण्याचा विळखा

By admin | Updated: November 21, 2014 00:36 IST

शिरोळ तालुक्यातील नद्या : साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्या दूषित बनल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात साथीचे आजार फैलावू लागले आहेत. सध्या गॅस्ट्रो, कावीळ, जुलाब यासह अन्य आजाराने जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील सर्वच नदीपात्रात दूषित पाणी दाखल झाले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. पिण्यास अयोग्य पाणी असल्याचा अहवाल पाणी तपासणी पथकाने प्रशासनास दिला आहे. मात्र, दूषित पाण्यावर प्रशासनाने उपाययोजना केल्या नसल्यामुळे अनेक गावांत साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे.सध्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटदुखी, जुलाब याची लागण झाली आहे, तर काही गावांत काविळीचे रुग्ण आढळून येत आहेत.दूषित पाण्याच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. औषध उपचारासह पाणी गरम करून पिण्याचा सल्ला सर्व डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी रुग्णांना देत आहेत. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाचा सल्लासर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. औषध उपचारासह पाणी दूषित असल्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देऊ लागले आहेत. प्रशासनानेही दूषित पाण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. ठोस उपाययोजनेची गरजदरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्याची दूषित पाण्यापासून सुटका व्हावी, यासाठी शासनपातळीवर अनेकवेळा आंदोलने करून लक्ष वेधण्यात आले आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत काही झालेले नाही. यामुळे ठोस कारवाईची गरज आहे. प्रदूषित नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.