शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:07 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता.

<p>समीर देशपांडे।कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता. खंबाटकीच्या घाटात जीप आणि एसटीची टक्कर झाली. शेजारचे दोघे ठार झाले. याचा पाय मोडला, छातीला मार लागला. तशातही स्ट्रेचरवरून मुलाखत दिली; पण या अपघाताने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जणू पुनर्जन्मच झाला. आता हा नवा जन्म समाजाच्या भल्यासाठी सार्थकी लावण्याचा त्याने निर्धार केला आणि गेली २५ वर्षे इंद्रजित देशमुख नावाचा अधिकारी याच निर्धाराने कार्यरत राहिला.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. देशमुख यांनी अवेळी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वेदनादायी ठरणारी आहे. देशमुख यांचे वडील दोन वेळा आमदार होते. सांगली जिल्ह्णातील खानापूर तालुक्यातील माहुली येथे घरची शेती. मनात आणलं असतं तर देशमुखी थाटात गावात रूबाब गाजवणं त्यांना अशक्य नव्हतं; पण विचार पक्का झाला होता आणि मग गटविकास अधिकारी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शिरोळचा कार्यभार स्वीकारला.शिरोळनंतर कराडला गटविकास अधिकारी, कोल्हापुरात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जलस्वराज्य, उपआयुक्त विकास या सर्व पदांवर काम करत असताना आपण कुणासाठी काम करत आहोत याचे भान सुटले नाही. जोडीला ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर होते. एकीकडे शासकीय कामकाज पाहत असतानाच गावोगावी देशमुख यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला.भ्रष्टाचारमुक्तीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि ग्रामविकासापासून ते राष्ट्रीय चारित्र्यापर्यंतची मांडणी होऊ लागली. पण ‘घेणार नाही, देणार नाही’ यामुळेही अडचण होऊ लागली आणि अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय झाला. आता प्रबोधनाचा देशमुख पॅटर्न जोमात राहणार हे नक्की.शिवम् प्रतिष्ठानची स्थापनानव्या पिढीला सुजाण करण्याची गरज असल्याने, मग कराड तालुक्यातील घारेवाडी इथं शिवम् प्रतिष्ठानची स्थापना झाली. हजारो युवकांसाठी शिबिरे, महिला, मुलींना प्रशिक्षण. वर्षभर उपक्रम सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचारांचा जागर सुरू असताना नाना पाटेकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत अनेकांशी संपर्क आला. हे सर्व सुरू असताना शासकीय जबाबदाऱ्या वाढतच होत्या.