शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:07 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता.

<p>समीर देशपांडे।कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता. खंबाटकीच्या घाटात जीप आणि एसटीची टक्कर झाली. शेजारचे दोघे ठार झाले. याचा पाय मोडला, छातीला मार लागला. तशातही स्ट्रेचरवरून मुलाखत दिली; पण या अपघाताने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जणू पुनर्जन्मच झाला. आता हा नवा जन्म समाजाच्या भल्यासाठी सार्थकी लावण्याचा त्याने निर्धार केला आणि गेली २५ वर्षे इंद्रजित देशमुख नावाचा अधिकारी याच निर्धाराने कार्यरत राहिला.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. देशमुख यांनी अवेळी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वेदनादायी ठरणारी आहे. देशमुख यांचे वडील दोन वेळा आमदार होते. सांगली जिल्ह्णातील खानापूर तालुक्यातील माहुली येथे घरची शेती. मनात आणलं असतं तर देशमुखी थाटात गावात रूबाब गाजवणं त्यांना अशक्य नव्हतं; पण विचार पक्का झाला होता आणि मग गटविकास अधिकारी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शिरोळचा कार्यभार स्वीकारला.शिरोळनंतर कराडला गटविकास अधिकारी, कोल्हापुरात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जलस्वराज्य, उपआयुक्त विकास या सर्व पदांवर काम करत असताना आपण कुणासाठी काम करत आहोत याचे भान सुटले नाही. जोडीला ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर होते. एकीकडे शासकीय कामकाज पाहत असतानाच गावोगावी देशमुख यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला.भ्रष्टाचारमुक्तीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि ग्रामविकासापासून ते राष्ट्रीय चारित्र्यापर्यंतची मांडणी होऊ लागली. पण ‘घेणार नाही, देणार नाही’ यामुळेही अडचण होऊ लागली आणि अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय झाला. आता प्रबोधनाचा देशमुख पॅटर्न जोमात राहणार हे नक्की.शिवम् प्रतिष्ठानची स्थापनानव्या पिढीला सुजाण करण्याची गरज असल्याने, मग कराड तालुक्यातील घारेवाडी इथं शिवम् प्रतिष्ठानची स्थापना झाली. हजारो युवकांसाठी शिबिरे, महिला, मुलींना प्रशिक्षण. वर्षभर उपक्रम सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचारांचा जागर सुरू असताना नाना पाटेकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत अनेकांशी संपर्क आला. हे सर्व सुरू असताना शासकीय जबाबदाऱ्या वाढतच होत्या.