शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:07 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता.

<p>समीर देशपांडे।कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता. खंबाटकीच्या घाटात जीप आणि एसटीची टक्कर झाली. शेजारचे दोघे ठार झाले. याचा पाय मोडला, छातीला मार लागला. तशातही स्ट्रेचरवरून मुलाखत दिली; पण या अपघाताने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जणू पुनर्जन्मच झाला. आता हा नवा जन्म समाजाच्या भल्यासाठी सार्थकी लावण्याचा त्याने निर्धार केला आणि गेली २५ वर्षे इंद्रजित देशमुख नावाचा अधिकारी याच निर्धाराने कार्यरत राहिला.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. देशमुख यांनी अवेळी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वेदनादायी ठरणारी आहे. देशमुख यांचे वडील दोन वेळा आमदार होते. सांगली जिल्ह्णातील खानापूर तालुक्यातील माहुली येथे घरची शेती. मनात आणलं असतं तर देशमुखी थाटात गावात रूबाब गाजवणं त्यांना अशक्य नव्हतं; पण विचार पक्का झाला होता आणि मग गटविकास अधिकारी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शिरोळचा कार्यभार स्वीकारला.शिरोळनंतर कराडला गटविकास अधिकारी, कोल्हापुरात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जलस्वराज्य, उपआयुक्त विकास या सर्व पदांवर काम करत असताना आपण कुणासाठी काम करत आहोत याचे भान सुटले नाही. जोडीला ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर होते. एकीकडे शासकीय कामकाज पाहत असतानाच गावोगावी देशमुख यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला.भ्रष्टाचारमुक्तीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि ग्रामविकासापासून ते राष्ट्रीय चारित्र्यापर्यंतची मांडणी होऊ लागली. पण ‘घेणार नाही, देणार नाही’ यामुळेही अडचण होऊ लागली आणि अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय झाला. आता प्रबोधनाचा देशमुख पॅटर्न जोमात राहणार हे नक्की.शिवम् प्रतिष्ठानची स्थापनानव्या पिढीला सुजाण करण्याची गरज असल्याने, मग कराड तालुक्यातील घारेवाडी इथं शिवम् प्रतिष्ठानची स्थापना झाली. हजारो युवकांसाठी शिबिरे, महिला, मुलींना प्रशिक्षण. वर्षभर उपक्रम सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचारांचा जागर सुरू असताना नाना पाटेकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत अनेकांशी संपर्क आला. हे सर्व सुरू असताना शासकीय जबाबदाऱ्या वाढतच होत्या.