शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी अटीमुळे शेतकरी प्रोत्साहनपासून वंचित; मंत्रालयस्तरावर बैठक होणार 

By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2023 19:45 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी निकषामुळे राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी शासनाच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत.

कोल्हापूर : राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी निकषामुळे राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी शासनाच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. संबंधित शेतकरी कर्ज घेतलेल्या बँकेच्या शाखांत हेलपाटे मारून थकले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडेही दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पदरी उडवाउडवीचीच उत्तरे येत आहेत. यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुढील आठवड्यात मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन केले आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची माफी देण्यात आली. सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परतफेड केली असल्यास त्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतलेल्या आणि पात्र असलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांना प्रोत्साहनचे अनुदान मिळाले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बॅँकांतून पीक कर्ज घेतलेल्या बहुतांशी पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.दुसऱ्या यादीत नाव आहे, केवायसी पूर्ण केली आहे तरीही पैसे जमा झालेले नाहीत. काही पात्र शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपयेच जमा झाले आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती स्थानिक पातळीवर कोणीही देत नसल्याने संबंधित शेतकरी हवालदिल बनला आहे. सर्व निकष पूर्ण केले आहेत किंवा दोनऐवजी एक वर्षे नियमित कर्जाची परतफेड केली आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत, अशाही कारणांमुळे अजूनही राज्यभरातील सव्वा लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांनाही अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी आमदार आबीटकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्याची दखल घेऊन ते मंत्रालय पातळीवर बैठक घेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर