शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी अटीमुळे शेतकरी प्रोत्साहनपासून वंचित; मंत्रालयस्तरावर बैठक होणार 

By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2023 19:45 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी निकषामुळे राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी शासनाच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत.

कोल्हापूर : राष्ट्रीयकृत बँकांच्या अतिरेकी निकषामुळे राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी शासनाच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. संबंधित शेतकरी कर्ज घेतलेल्या बँकेच्या शाखांत हेलपाटे मारून थकले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडेही दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पदरी उडवाउडवीचीच उत्तरे येत आहेत. यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुढील आठवड्यात मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन केले आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची माफी देण्यात आली. सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परतफेड केली असल्यास त्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतलेल्या आणि पात्र असलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांना प्रोत्साहनचे अनुदान मिळाले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बॅँकांतून पीक कर्ज घेतलेल्या बहुतांशी पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.दुसऱ्या यादीत नाव आहे, केवायसी पूर्ण केली आहे तरीही पैसे जमा झालेले नाहीत. काही पात्र शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपयेच जमा झाले आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती स्थानिक पातळीवर कोणीही देत नसल्याने संबंधित शेतकरी हवालदिल बनला आहे. सर्व निकष पूर्ण केले आहेत किंवा दोनऐवजी एक वर्षे नियमित कर्जाची परतफेड केली आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत, अशाही कारणांमुळे अजूनही राज्यभरातील सव्वा लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांनाही अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी आमदार आबीटकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्याची दखल घेऊन ते मंत्रालय पातळीवर बैठक घेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर