शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

‘अनामत’ शासकीय तिजोरीमध्ये पडूनच क्वचितच रक्कम परत : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पन्हा चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:59 IST

राधानगरी : कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी अर्ज दाखल करताना ठराविक रक्कम निवडणूक अनामत म्हणून जमा करावी लागते

संजय पारकर ।राधानगरी : कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी अर्ज दाखल करताना ठराविक रक्कम निवडणूक अनामत म्हणून जमा करावी लागते. निवडणुकीच्या निकालानंतर मिळालेल्या मतांवर ती परत मिळणार की नाही हे ठरते. झालेल्या मतांतून वैध ठरलेली मते भागिले निवडायच्या जागा व त्याच्या आठव्या भागाएवढी मते मिळाली तरच अशी अनामत परत मिळते, अन्यथा ती जप्त होऊन सरकारी तिजोरीत जमा होते. हा झाला नियम. प्रत्यक्षात मात्र क्वचितच ही रक्कम परत मिळते. अघोषितरीत्या ती जप्त होते. किरकोळ वाटत असली तर एकत्रित विचार केल्यास लाखो रुपये लोकांच्या खिशातून अलगदपणे काढले जातात.दोन महिन्यांपूर्वी मोठ्या संख्येने झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आला आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण वर्गासाठी ५०० व मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय गटासाठी १०० अशी अनामत होती. किमान सात व कमाल सतरा अशी सदस्यसंख्या असते. याशिवाय सरपंचपद स्वतंत्र होते ते उमेदवारही वाढले. एका गटाकडून डमीसह दुप्पट अर्ज दाखल होतात. किमान दुरंगी लढत असल्यास दहा हजार ते पंचवीस हजार इतकी रक्कम एका गावाच्या निवडणूक अधिकाºयाकडे जमा होते. उमेदवारांची संख्या वाढली तर ही रक्कम आणखी वाढते. एकत्रितपणे विचार केला तर लाखो रुपये निवडणूक अनामत म्हणून जमा होतात.काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ २५ रुपये अनामत होती, त्यामुळे निवडणूक झाल्यावर ती परत घेण्याची कोणी मागणी करीत नव्हते. मात्र, आता हा आकडा वाढल्याने सर्वसामान्य उमेदवारासाठी ही रक्कम महत्त्वाची असते. म्हणून ती परत घेण्यासाठी धडपड असते. जमा होणारी रक्कम त्या निवडणूक अधिकाºयाकडे शिल्लक असते. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर ती जप्त झाली तर सरकारी खजिन्यात जमा करावी लागते. अन्यथा, उमेदवारांना परत करावी लागते. काही अधिकारी ही रक्कम संबंधितांना परत देतात. मात्र, बहुतांश ती देतच नाहीत. यासाठी अर्ज घेतानाच पोहोच घेतली जाते. त्यामुळे वेगळी पोहोच घ्यावी लागत नाही. याचा फायदा घेत काही अधिकारी ही रक्कम देण्याचे टाळतात. जास्त तगादा झाल्यास थोडीफार रक्कम देऊन बोळवण केली जाते.

किरकोळ रक्कम म्हणून मागण्यास टाळाटाळनिवडणुकीत एवढा खर्च केला, त्याचे काय नाही, मग ही किरकोळ रक्कम कशाला मागता, असे म्हणून टाळाटाळ होते. निवडूून आलेल्यांना खुशी म्हणून रक्कम राहू दे, असे सांगितले जाते. सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्येही अशीच स्थिती असते.