शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘अनामत’ शासकीय तिजोरीमध्ये पडूनच क्वचितच रक्कम परत : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पन्हा चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:59 IST

राधानगरी : कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी अर्ज दाखल करताना ठराविक रक्कम निवडणूक अनामत म्हणून जमा करावी लागते

संजय पारकर ।राधानगरी : कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी अर्ज दाखल करताना ठराविक रक्कम निवडणूक अनामत म्हणून जमा करावी लागते. निवडणुकीच्या निकालानंतर मिळालेल्या मतांवर ती परत मिळणार की नाही हे ठरते. झालेल्या मतांतून वैध ठरलेली मते भागिले निवडायच्या जागा व त्याच्या आठव्या भागाएवढी मते मिळाली तरच अशी अनामत परत मिळते, अन्यथा ती जप्त होऊन सरकारी तिजोरीत जमा होते. हा झाला नियम. प्रत्यक्षात मात्र क्वचितच ही रक्कम परत मिळते. अघोषितरीत्या ती जप्त होते. किरकोळ वाटत असली तर एकत्रित विचार केल्यास लाखो रुपये लोकांच्या खिशातून अलगदपणे काढले जातात.दोन महिन्यांपूर्वी मोठ्या संख्येने झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आला आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण वर्गासाठी ५०० व मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय गटासाठी १०० अशी अनामत होती. किमान सात व कमाल सतरा अशी सदस्यसंख्या असते. याशिवाय सरपंचपद स्वतंत्र होते ते उमेदवारही वाढले. एका गटाकडून डमीसह दुप्पट अर्ज दाखल होतात. किमान दुरंगी लढत असल्यास दहा हजार ते पंचवीस हजार इतकी रक्कम एका गावाच्या निवडणूक अधिकाºयाकडे जमा होते. उमेदवारांची संख्या वाढली तर ही रक्कम आणखी वाढते. एकत्रितपणे विचार केला तर लाखो रुपये निवडणूक अनामत म्हणून जमा होतात.काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ २५ रुपये अनामत होती, त्यामुळे निवडणूक झाल्यावर ती परत घेण्याची कोणी मागणी करीत नव्हते. मात्र, आता हा आकडा वाढल्याने सर्वसामान्य उमेदवारासाठी ही रक्कम महत्त्वाची असते. म्हणून ती परत घेण्यासाठी धडपड असते. जमा होणारी रक्कम त्या निवडणूक अधिकाºयाकडे शिल्लक असते. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर ती जप्त झाली तर सरकारी खजिन्यात जमा करावी लागते. अन्यथा, उमेदवारांना परत करावी लागते. काही अधिकारी ही रक्कम संबंधितांना परत देतात. मात्र, बहुतांश ती देतच नाहीत. यासाठी अर्ज घेतानाच पोहोच घेतली जाते. त्यामुळे वेगळी पोहोच घ्यावी लागत नाही. याचा फायदा घेत काही अधिकारी ही रक्कम देण्याचे टाळतात. जास्त तगादा झाल्यास थोडीफार रक्कम देऊन बोळवण केली जाते.

किरकोळ रक्कम म्हणून मागण्यास टाळाटाळनिवडणुकीत एवढा खर्च केला, त्याचे काय नाही, मग ही किरकोळ रक्कम कशाला मागता, असे म्हणून टाळाटाळ होते. निवडूून आलेल्यांना खुशी म्हणून रक्कम राहू दे, असे सांगितले जाते. सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्येही अशीच स्थिती असते.